शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

फांगुळगव्हाण परिसरातील पाणीप्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:28 IST

फांगुळगव्हाण परिसरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शारीरिक अंतर राखत सामूहिक श्रमदानातून विहीर साकारण्यात आली असून, महिलांची पायपीट थांबणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्दे एकीचे बळ : लॉकडाऊनच्या कालावधीत ग्रामस्थांनी साकारली विहीर

इगतपुरी : तालुक्यातील फांगुळगव्हाण परिसरातील शिवाजीनगर भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शारीरिक अंतर राखत सामूहिक श्रमदानातून विहीर साकारण्यात आली असून, महिलांची पायपीट थांबणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यानिमित्ताने गावातील एकोप्याचे दर्शन घडले असून, इतर गावांसाठी हा उपक्रम आदर्शवत ठरला आहे.अनेक वर्षांपासून फांगुळगव्हाण, शिवाजीनगर भागात पाण्याची समस्या पाचवीलाच पूजलेली होती. उन्हाळ्यात जलवाहिनीद्वारे पाणी येते, मात्र पावसाळ्यात विजेची अडचण, मशीन वारंवार बिघडणे यामुळे पाण्याची समस्या जाणवत होती. पावसाळ्यात महिलांना निसरड्या बांधांवरून ५०० मीटर अंतरावर पायी चालत जावे लागत असे. बांधावरून घसरल्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत.या भागात एकही विहीर नसल्याने व गावची पाणीपुरवठा योजना अर्धवट असल्याने यंदाच्या पावसाळ्यात पाणी समस्या उद्भवणार होती. मात्र, येथील सेवाभावी तरुण धनराज म्हसणे, ईश्वर चव्हाण यांनी गावातील तरुणांना एकत्र करत लॉकडाऊनच्या सुट्टीचा व वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रस्ताव समोर आणला. या परिसरात विहीर खोदण्याचा व विहिरीपर्यंत रस्ता साकारण्याचा विचार ग्रामस्थांपुढे मांडला. यावर कृष्णा आंदाडे, रायबा भगत, खुशाल चव्हाण, भगीरथ म्हसणे, रतन म्हसणे, धनराज भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ भटाटे, दिनेश आंदाडे, चंद्रकांत गतिर, आक्षय चव्हाण, आजय म्हसणे, बाळू आंदाडे, हरिभाऊ म्हसणे, राममकिसन म्हसणे, प्रमोद म्हसणे आदी तरुणांनी विहीर खोदायच्या कामाला सुरुवात केली. या कामासाठी भगवान महाराज म्हसणे, राजीव कुमार, शक्ती उपाध्याय, व्यंकटेश भागडे, तलाठी ठाकरे, ग्रामसेवक सानप, वैभव गगे व शिवप्रेमी मित्रमंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.तरुण करीत असलेले काम पाहून शिवाजीनगरमधील आबालवृद्धांनीही यथाशक्ती मदत केली. अवघ्या पाच दिवसांत २० फूट खोल विहीर खोदली. परिसरातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने विहिरीच्या कठड्याचे कॉँक्रिटीकरण करण्यात आले. बांधकाम कारागीर सुभाष म्हसणे, आशोक म्हसणे, हरिश्चंद्र भागडे, राजू भागडे, सोमनाथ म्हसणे, मनोहर म्हसणे, रतन म्हसणे यांनी विनामूल्य काम पूर्ण केले.

टॅग्स :Waterपाणी