शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

आळंदी धरणालगतच्या गावांनाही पाण्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:43 IST

दिंडोरी तालुक्यातील आळंदी धरणाच्या वरच्या बाजूने वसलेल्या व नाशिकच्या सरहद्दीवर असलेल्या गयाचीवाडी या गावाला शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून, आळंदी धरणातील पाणी नाशिक तालुक्यातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी सोडल्याने धरणात आता जेमतेम पाणी शिल्लक राहिले आहे.

ठळक मुद्देबोअरवेल आटली : लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर व आळंदी धरणाला लागून असलेल्या गयाची वाडीला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास असली तरी, गावाला जेमतेम दोनशे लिटर पाणी मिळत असल्याने पिण्याचे पाणी हा गावात कळीचा मुद्दा झाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील आळंदी धरणाच्या वरच्या बाजूने वसलेल्या व नाशिकच्या सरहद्दीवर असलेल्या गयाचीवाडी या गावाला शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून, आळंदी धरणातील पाणी नाशिक तालुक्यातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी सोडल्याने धरणात आता जेमतेम पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे जनावरे जगू शकतील, पण पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना बोअरवेलवर अवलंबून रहावे लागत आहे. एरव्ही भरपूर पाणीपुरवठा करणारी बोअरवेल दिवसा फक्त दोनशे लिटरच्या आसपास पाणी देत असून, गेल्या महिनाभरापासून हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. बोअरवेलमध्ये जेव्हा पाणी येईल तेवढ्यावर पाण्याची टाकी भरून घ्यावी लागते आणि तितकेच पाणी गावासाठी देण्यात येते. जेमतेम दोनशे लिटर पाणी गावासाठी देण्यात येत आहे. गावाची लोकसंख्या १२०० तर पाणीपुरवठा दोनशे त्यामुळे पाण्यावरून नेहमी वाद होत असल्याचे दिसत आहे. भाग असल्याने या भागात सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचे यावेळी गावातील महिलांनी सांगितले. शासकीय कामे सोडता गावातील लोकांचा दिंडोरीशी काहीही संबंध येत नसल्याने सर्व दैनंदिन व्यवहार गिरणारे गावाशी होत असल्याने पाणीप्रश्नाबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी येथील ग्रामस्थ दिंडोरीला जाण्यासाठी धजावत नाहीत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक