शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आळंदी धरणालगतच्या गावांनाही पाण्याची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:43 IST

दिंडोरी तालुक्यातील आळंदी धरणाच्या वरच्या बाजूने वसलेल्या व नाशिकच्या सरहद्दीवर असलेल्या गयाचीवाडी या गावाला शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून, आळंदी धरणातील पाणी नाशिक तालुक्यातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी सोडल्याने धरणात आता जेमतेम पाणी शिल्लक राहिले आहे.

ठळक मुद्देबोअरवेल आटली : लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर व आळंदी धरणाला लागून असलेल्या गयाची वाडीला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, गावाची लोकसंख्या बाराशेच्या आसपास असली तरी, गावाला जेमतेम दोनशे लिटर पाणी मिळत असल्याने पिण्याचे पाणी हा गावात कळीचा मुद्दा झाला आहे.

दिंडोरी तालुक्यातील आळंदी धरणाच्या वरच्या बाजूने वसलेल्या व नाशिकच्या सरहद्दीवर असलेल्या गयाचीवाडी या गावाला शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून, आळंदी धरणातील पाणी नाशिक तालुक्यातील गावांना पाणीपुरवठ्यासाठी सोडल्याने धरणात आता जेमतेम पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे जनावरे जगू शकतील, पण पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना बोअरवेलवर अवलंबून रहावे लागत आहे. एरव्ही भरपूर पाणीपुरवठा करणारी बोअरवेल दिवसा फक्त दोनशे लिटरच्या आसपास पाणी देत असून, गेल्या महिनाभरापासून हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. बोअरवेलमध्ये जेव्हा पाणी येईल तेवढ्यावर पाण्याची टाकी भरून घ्यावी लागते आणि तितकेच पाणी गावासाठी देण्यात येते. जेमतेम दोनशे लिटर पाणी गावासाठी देण्यात येत आहे. गावाची लोकसंख्या १२०० तर पाणीपुरवठा दोनशे त्यामुळे पाण्यावरून नेहमी वाद होत असल्याचे दिसत आहे. भाग असल्याने या भागात सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचे यावेळी गावातील महिलांनी सांगितले. शासकीय कामे सोडता गावातील लोकांचा दिंडोरीशी काहीही संबंध येत नसल्याने सर्व दैनंदिन व्यवहार गिरणारे गावाशी होत असल्याने पाणीप्रश्नाबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी येथील ग्रामस्थ दिंडोरीला जाण्यासाठी धजावत नाहीत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक