शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

बंधा-यात आवर्तनाचे पाणी, नामपूरकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:53 IST

शेवटचे आवर्तन : महिनाभराचा पाणीप्रश्न सुटला

ठळक मुद्देयामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर भरली असून नविन विहीरीतही पाणी उतरले आहे.

नामपूर : शहर भयावह पाणीटंचाईस तोंड देत असतांनांच नामपूरला दीड कोटी रु पये खर्चून तयार केलेल्या केटिवेअर योजनेचे काम पूर्ण झाले असून मोसमनदीचे या वर्षाचे शेवटचे आवर्तनाचे पाणी या केटिवेअरमध्ये आल्यामुळे नामपूरचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यान, यामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर भरली असून नविन विहीरीतही पाणी उतरले आहे. त्यातच नदीकाठावरील इंधनविहीरीना पाणी उतरायला सुरु वात झाल्याने पावासाळा सुरु होईपर्यंत महिनाभरासाठी का होईना नामपूरकरांना दिलासा मिळणार आहे.केटीवेअरला पाणी आल्यामुळे सधनलोक जमिनी घेऊन येथून पाणी इतरत्र नेण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मूळ हेतू बाजूला राहिल. त्यामुळे शुक्रवारी (दि.१७) श्रीराम मंदिरात ग्रामस्थांची सभा नामपूरचे सेवानिवृत्त अध्यापक शरद नेरकर यांचे अध्यक्षस्थानी घेण्यात आली. सभेत पाणी व वाळूतस्करी यावर चर्चा करण्यात आली. यात काही निर्णय घेण्यात आले. नदीकाठापासून १०० मीटर अंतरापर्यत नविन विहीर खोदू नये. आढळल्यास ग्रामपंचायतीने कारवाई करावी. मोठा बंधारा ते नकट्या बंधा-यापर्यंत वाळूउपशावर बंदी घालावी. शिवारातले पाणी शिवारातच ठेवावे. पाईपलाईन किंवा टॅँकरमधून शिवाराबाहेर पाणी नेऊ नये आदी, महत्वपूर्ण ठराव करण्यात आले. यावेळी केटिवेअरसाठी प्रयत्न करणारे डॉ. गिरासे यांचा गौरव करण्यात आला.विविध सूचनाग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच दक्ष रहावे असे आवाहन नामपूरचे सामाजिक कार्यकर्ते दिपक सावंत व संभाजी सावंत यांनी केले . तर नदीची नांगरणी केल्यास पाणीपातळी वाढण्यास मदत होईल यावरही चर्चा झाली. चर्चेत बाजीराव सावंत, किरण अहिरे, दिपक सावंत ,संभाजी सावंत, प्रविण सावंत,अशोक सुर्यवंशी , कविता सावंत, राजेंद्र सावंत, प्रमोद सावंत, विनोद सावंत. अश्पाक पठाण आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी