शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

पाणीबचतीचा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 19:10 IST

पाणीबचतीचा मंत्र प्रत्येकालाच आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नसेल. आज पाणी वाचविले तर भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

पाणीबचतीचा मंत्र प्रत्येकालाच आपल्या जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नसेल. आज पाणी वाचविले तर भविष्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.  महापालिकेतून पाणीपुरवठा झालेले पाणी आपण फक्त पिण्यासाठी वापरले पाहिजे. आणि इतरांनाही तोच नियम लागू पडतो. नागरिकांनी आपली वाहने धुण्याऐवजी बादलीभर पाण्यात ती स्वच्छ पुसून काढली आणि फरशी आणि गाडी पुसलेले पाणी झाडांना टाकले तर बाराही महिने झाडे हिरवीगार राहतील. कित्येक गावांमध्ये जिथे टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा ठिकाणी स्त्रिया पाण्याचा जपून वापर करतात. पाण्याचा पुनर्वापर करतात. नाशिक परिसरात एवढी पाणीटंचाई जाणवत नाही; पण नाशिकमधील पावसाचे, गोदावरी नदीचे पाणी पुढे मराठवाड्यातील कित्येक गावांना पुरविले जाते. म्हणून आपण सर्वांनी पाणी वाचविणे आणि ते जपून वापरणे जरुरीचे आहे. नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात जमिनीतील पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. तेव्हा पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत कसे मुरविता येईल याकडेदेखील लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात छतावर पडलेले पाणी थोडेसे टाळून जमिनीखाली बनविलेल्या टाकीत साठवून ठेवले तर अनेक वर्षं ते पाणी वापरता येईल. याला (रेन वॉटर हार्वेस्टिंग) पावसाचे पाणी साठविणे म्हणतात. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पावसाचे पाणी शोषखड्ड्यात साठविले जाते आणि ते पाणी जमिनीत मुरते. बऱ्याच मोठ्या संस्था ही कामे करीत आहेत....हे करता येईल!प्रत्येक व्यक्तीने आणि प्रत्येक घरात पाणी वाचविले गेले तर पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. नाशिक हे औद्योगिक शहर आहे. नाशिकला बºयाच कंपन्या आहे. प्रत्येक कारखान्यामध्ये पाणी वापरले जाते. कारखाने, कचेºयातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी पाण्याचा योग्य वापर होतो आहे की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणाकडेही जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. पाणी हे जीवन आहे आणि त्याच्या शुद्धतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. त्यामुळे, पाणी दूषित होणार नाही यासाठी उपाययोजना महत्त्वाची आहे.नाशिकमध्ये जलतरण तलाव खूप आहेत. सरकारी आणि खासगी जलतरण तलावांना बरेच पाणी लागते. तेथेही पाण्याची बचत होऊ शकते. आजकाल जिकडे तिकडे शॉपिंग मॉल्स बघायला मिळतात. तिथेही पाण्याचा अपव्यय टाळता येईल. गाड्या धुण्यापेक्षा, घरातील फरशा, धुण्यापेक्षा त्या ओल्या कपड्याने पुसण्यावर भर द्यावा.

- डॉ. सुवर्णा तांबडे

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई