शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

उपनगरांमध्ये घरात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:21 IST

बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडविली. जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने सातपूरकरांना अक्षरश: झोडपून काढले.

सातपूर : बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडविली. जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने सातपूरकरांना अक्षरश: झोडपून काढले. रस्त्यावरील भाजीपाला आणि किरकोळ विक्रे त्यांची चांगलीच धावपळ उडाली. रस्त्यावर एक फूट पावसाचे पाणी साचले होते.दरम्यान, सिडको, पाथर्डी फाटा, अंबड गाव भागातील काही घरांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील जितेंद्र यादव यांच्या नम्रता निवासमध्ये पावसाचे पाणी शिरले. पावसाचे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरल्याने यादव यांनी अखेर सातपूर अग्निशमन केंद्राकडे मदत मागितली. अग्निशमन केंद्राचा एक बंब आणि कर्मचाऱ्यांनी यादव यांच्या घरातील पाणी बाहेर काढले.नासर्डीला पूर; उंटवाडी पुलाला लागले पाणीसिडको : परिसरात बुधवारी (दि.२५) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सिडको भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच नासर्डी नदीला पूर आल्याने उंटवाडी तसेच आयटीआय पुलाला पाणी लागले होते. तर सखल भागात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सिडको परिसरात काल सायंकाळी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या अचानक झालेल्या पावसामुळे सिडको भागातील सखल भागात पाणी साचले होते. यात जुने सिडकोतील खोडे मळा परिसरातील वृंदावननगर, मंगलमूर्तीनगर, पंडितनगर, बडदेनगर, गोपालकृष्ण चौक, इंदिरा गांधी वसाहत, गणेश चौक, उत्तमनगर, अंबड भागातील महालक्ष्मीनगर, डीजीपीनगर, खुटवडनगर या भागातील खोलगट भागात पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे नासर्डी नदीला पूर आला होता. त्यामुळे उंटवाडी व आयटीआय पुलाला पाणी लागले होते. याठिकाणी अंबड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी