शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

सलग दुसऱ्या वर्षीही पाण्याची मागणी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर अखेरपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असत. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात पावसाची ...

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर अखेरपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असत. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात पावसाची कृपा होवून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस नोंदविला गेला. परिणामी नद्या, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याबरोबरच धरणाच्या साठ्यातही कमालिचा जलसाठा होऊ लागला आहे. यंदा फेब्रुवारीच्या मध्यान्ही सरासरी ६८ टक्के पाणी धरणांमध्ये असून, जलसंपदा विभागाच्या मते जुलै अखेरपर्यंत हा साठा पिण्यासाठी पुरेसा आहे. सन २०२०मध्ये हाच जलसाठा ७९ टक्के होता. सातत्याने गेल्या दोन वर्षापासून ऑक्टोंबर, नोव्हेंबर या दोन महिन्यात अवकाळी पावसाची अतिवृष्टी होत असल्याने जमीनीखालील भूजल साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा रब्बी पिकासाठी धरणातून आवर्तन सोडण्याची मागणीही घटली आहे. परिणामी धरणांमध्ये पुरेसे पाणी शिल्लक आहे.

चौकट===

टंचाई आराखडा कोरडाच

यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर महिन्यातच संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला. उन्हाळ्यात जिल्ह्यातील ६०४ गावे व ७१८ वाड्यांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या कामांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले. पहिल्या टप्प्यात एकही काम यंत्रणेकडून सुचविण्यात आले नाही. मात्र जानेवारीपासून दुसरा टप्पा सुरू झाला असतांनाही अद्याप उपाययोजनांबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आलेले नाहीत. यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई निवारणासाठी ११ कोटी १९ लाख, ७७ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असला तरी, गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता पाणी टंचाई निवारणासाठी इतका खर्च होण्याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा परिणाम

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा कहर ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने व यंदाही अद्याप त्याचा प्रभाव असल्याने त्याचाही पाण्याच्या वापरावर परिणाम शक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे शेती व्यवस्था पुर्णत: ठप्प होवून शेती पिकासाठी पाण्याची मागणी घटली, त्याच बरोबर पाणी टंचाईचाही परिणाम जाणवला नाही. त्यामुळे टंचाई कृती आराखड्याच्या तिसऱ्या व अंतीम टप्प्यात एप्रिल महिन्यानंतर ग्रामीण भागात टॅँकरची मागणी वाढून संपुर्ण उन्हाळ्यात कृती आराखड्यानुसार जेमतेम दिड कोटी रूपये खर्च होवू शकले होते. यंदाही जवळपास तशीच परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र यंदा लवकर उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा अंदाज असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते साधारणत: मार्च महिन्यातच टॅँकर सुरू करावे लागतील असे चित्र आहे.

------

जिल्ह्यातील धरणातील जलसाठा (टक्केवारी)

* गंगापूर (समुह)- ६१

* पालखेड- ३७

* करंजवण- ६५

* वाघाड- ३४

* ओझरखेड- ६७

* पुणेगाव- ६१

* तिसगाव- ६२

* दारणा- ८९

* भावली- ९३

* मुकणे- ७०

* वालदेवी- ९३

* कडवा- ५८

* नांदुरमध्यमेश्वर- १००

* भोजापुर- ७९

* चणकापुर- ८१

* हरणबारी- ८१

* केळझर- ७१

* नागासाक्या- ८३

* गिरणा- ६०

* पुनद- ९२

* माणिकपुंज- ७०