शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

सलग दुसऱ्या वर्षीही पाण्याची मागणी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर अखेरपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असत. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात पावसाची ...

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर अखेरपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असत. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात पावसाची कृपा होवून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस नोंदविला गेला. परिणामी नद्या, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याबरोबरच धरणाच्या साठ्यातही कमालिचा जलसाठा होऊ लागला आहे. यंदा फेब्रुवारीच्या मध्यान्ही सरासरी ६८ टक्के पाणी धरणांमध्ये असून, जलसंपदा विभागाच्या मते जुलै अखेरपर्यंत हा साठा पिण्यासाठी पुरेसा आहे. सन २०२०मध्ये हाच जलसाठा ७९ टक्के होता. सातत्याने गेल्या दोन वर्षापासून ऑक्टोंबर, नोव्हेंबर या दोन महिन्यात अवकाळी पावसाची अतिवृष्टी होत असल्याने जमीनीखालील भूजल साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा रब्बी पिकासाठी धरणातून आवर्तन सोडण्याची मागणीही घटली आहे. परिणामी धरणांमध्ये पुरेसे पाणी शिल्लक आहे.

चौकट===

टंचाई आराखडा कोरडाच

यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर महिन्यातच संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला. उन्हाळ्यात जिल्ह्यातील ६०४ गावे व ७१८ वाड्यांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या कामांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले. पहिल्या टप्प्यात एकही काम यंत्रणेकडून सुचविण्यात आले नाही. मात्र जानेवारीपासून दुसरा टप्पा सुरू झाला असतांनाही अद्याप उपाययोजनांबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आलेले नाहीत. यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई निवारणासाठी ११ कोटी १९ लाख, ७७ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असला तरी, गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता पाणी टंचाई निवारणासाठी इतका खर्च होण्याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा परिणाम

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा कहर ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने व यंदाही अद्याप त्याचा प्रभाव असल्याने त्याचाही पाण्याच्या वापरावर परिणाम शक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे शेती व्यवस्था पुर्णत: ठप्प होवून शेती पिकासाठी पाण्याची मागणी घटली, त्याच बरोबर पाणी टंचाईचाही परिणाम जाणवला नाही. त्यामुळे टंचाई कृती आराखड्याच्या तिसऱ्या व अंतीम टप्प्यात एप्रिल महिन्यानंतर ग्रामीण भागात टॅँकरची मागणी वाढून संपुर्ण उन्हाळ्यात कृती आराखड्यानुसार जेमतेम दिड कोटी रूपये खर्च होवू शकले होते. यंदाही जवळपास तशीच परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र यंदा लवकर उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा अंदाज असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते साधारणत: मार्च महिन्यातच टॅँकर सुरू करावे लागतील असे चित्र आहे.

------

जिल्ह्यातील धरणातील जलसाठा (टक्केवारी)

* गंगापूर (समुह)- ६१

* पालखेड- ३७

* करंजवण- ६५

* वाघाड- ३४

* ओझरखेड- ६७

* पुणेगाव- ६१

* तिसगाव- ६२

* दारणा- ८९

* भावली- ९३

* मुकणे- ७०

* वालदेवी- ९३

* कडवा- ५८

* नांदुरमध्यमेश्वर- १००

* भोजापुर- ७९

* चणकापुर- ८१

* हरणबारी- ८१

* केळझर- ७१

* नागासाक्या- ८३

* गिरणा- ६०

* पुनद- ९२

* माणिकपुंज- ७०