शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सलग दुसऱ्या वर्षीही पाण्याची मागणी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर अखेरपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असत. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात पावसाची ...

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर अखेरपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असत. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात पावसाची कृपा होवून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस नोंदविला गेला. परिणामी नद्या, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याबरोबरच धरणाच्या साठ्यातही कमालिचा जलसाठा होऊ लागला आहे. यंदा फेब्रुवारीच्या मध्यान्ही सरासरी ६८ टक्के पाणी धरणांमध्ये असून, जलसंपदा विभागाच्या मते जुलै अखेरपर्यंत हा साठा पिण्यासाठी पुरेसा आहे. सन २०२०मध्ये हाच जलसाठा ७९ टक्के होता. सातत्याने गेल्या दोन वर्षापासून ऑक्टोंबर, नोव्हेंबर या दोन महिन्यात अवकाळी पावसाची अतिवृष्टी होत असल्याने जमीनीखालील भूजल साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा रब्बी पिकासाठी धरणातून आवर्तन सोडण्याची मागणीही घटली आहे. परिणामी धरणांमध्ये पुरेसे पाणी शिल्लक आहे.

चौकट===

टंचाई आराखडा कोरडाच

यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर महिन्यातच संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला. उन्हाळ्यात जिल्ह्यातील ६०४ गावे व ७१८ वाड्यांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या कामांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले. पहिल्या टप्प्यात एकही काम यंत्रणेकडून सुचविण्यात आले नाही. मात्र जानेवारीपासून दुसरा टप्पा सुरू झाला असतांनाही अद्याप उपाययोजनांबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आलेले नाहीत. यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई निवारणासाठी ११ कोटी १९ लाख, ७७ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असला तरी, गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता पाणी टंचाई निवारणासाठी इतका खर्च होण्याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा परिणाम

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा कहर ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने व यंदाही अद्याप त्याचा प्रभाव असल्याने त्याचाही पाण्याच्या वापरावर परिणाम शक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे शेती व्यवस्था पुर्णत: ठप्प होवून शेती पिकासाठी पाण्याची मागणी घटली, त्याच बरोबर पाणी टंचाईचाही परिणाम जाणवला नाही. त्यामुळे टंचाई कृती आराखड्याच्या तिसऱ्या व अंतीम टप्प्यात एप्रिल महिन्यानंतर ग्रामीण भागात टॅँकरची मागणी वाढून संपुर्ण उन्हाळ्यात कृती आराखड्यानुसार जेमतेम दिड कोटी रूपये खर्च होवू शकले होते. यंदाही जवळपास तशीच परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र यंदा लवकर उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा अंदाज असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते साधारणत: मार्च महिन्यातच टॅँकर सुरू करावे लागतील असे चित्र आहे.

------

जिल्ह्यातील धरणातील जलसाठा (टक्केवारी)

* गंगापूर (समुह)- ६१

* पालखेड- ३७

* करंजवण- ६५

* वाघाड- ३४

* ओझरखेड- ६७

* पुणेगाव- ६१

* तिसगाव- ६२

* दारणा- ८९

* भावली- ९३

* मुकणे- ७०

* वालदेवी- ९३

* कडवा- ५८

* नांदुरमध्यमेश्वर- १००

* भोजापुर- ७९

* चणकापुर- ८१

* हरणबारी- ८१

* केळझर- ७१

* नागासाक्या- ८३

* गिरणा- ६०

* पुनद- ९२

* माणिकपुंज- ७०