शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सलग दुसऱ्या वर्षीही पाण्याची मागणी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:14 IST

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर अखेरपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असत. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात पावसाची ...

नाशिक जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर अखेरपासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असत. मात्र गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यात पावसाची कृपा होवून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस नोंदविला गेला. परिणामी नद्या, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याबरोबरच धरणाच्या साठ्यातही कमालिचा जलसाठा होऊ लागला आहे. यंदा फेब्रुवारीच्या मध्यान्ही सरासरी ६८ टक्के पाणी धरणांमध्ये असून, जलसंपदा विभागाच्या मते जुलै अखेरपर्यंत हा साठा पिण्यासाठी पुरेसा आहे. सन २०२०मध्ये हाच जलसाठा ७९ टक्के होता. सातत्याने गेल्या दोन वर्षापासून ऑक्टोंबर, नोव्हेंबर या दोन महिन्यात अवकाळी पावसाची अतिवृष्टी होत असल्याने जमीनीखालील भूजल साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा रब्बी पिकासाठी धरणातून आवर्तन सोडण्याची मागणीही घटली आहे. परिणामी धरणांमध्ये पुरेसे पाणी शिल्लक आहे.

चौकट===

टंचाई आराखडा कोरडाच

यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर महिन्यातच संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठविला. उन्हाळ्यात जिल्ह्यातील ६०४ गावे व ७१८ वाड्यांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या कामांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले. पहिल्या टप्प्यात एकही काम यंत्रणेकडून सुचविण्यात आले नाही. मात्र जानेवारीपासून दुसरा टप्पा सुरू झाला असतांनाही अद्याप उपाययोजनांबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आलेले नाहीत. यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई निवारणासाठी ११ कोटी १९ लाख, ७७ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असला तरी, गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता पाणी टंचाई निवारणासाठी इतका खर्च होण्याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाचा परिणाम

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा कहर ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्याने व यंदाही अद्याप त्याचा प्रभाव असल्याने त्याचाही पाण्याच्या वापरावर परिणाम शक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे शेती व्यवस्था पुर्णत: ठप्प होवून शेती पिकासाठी पाण्याची मागणी घटली, त्याच बरोबर पाणी टंचाईचाही परिणाम जाणवला नाही. त्यामुळे टंचाई कृती आराखड्याच्या तिसऱ्या व अंतीम टप्प्यात एप्रिल महिन्यानंतर ग्रामीण भागात टॅँकरची मागणी वाढून संपुर्ण उन्हाळ्यात कृती आराखड्यानुसार जेमतेम दिड कोटी रूपये खर्च होवू शकले होते. यंदाही जवळपास तशीच परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र यंदा लवकर उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा अंदाज असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते साधारणत: मार्च महिन्यातच टॅँकर सुरू करावे लागतील असे चित्र आहे.

------

जिल्ह्यातील धरणातील जलसाठा (टक्केवारी)

* गंगापूर (समुह)- ६१

* पालखेड- ३७

* करंजवण- ६५

* वाघाड- ३४

* ओझरखेड- ६७

* पुणेगाव- ६१

* तिसगाव- ६२

* दारणा- ८९

* भावली- ९३

* मुकणे- ७०

* वालदेवी- ९३

* कडवा- ५८

* नांदुरमध्यमेश्वर- १००

* भोजापुर- ७९

* चणकापुर- ८१

* हरणबारी- ८१

* केळझर- ७१

* नागासाक्या- ८३

* गिरणा- ६०

* पुनद- ९२

* माणिकपुंज- ७०