शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाण्याची उपलब्धता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:36 IST

उन्हामुळे दिवसेंदिवस उष्णतेच्या झळा वाढत चालल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मनुष्य पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कुठूनही सोय करू शकतो; परंतु तहान भागवण्यासाठी पशू-पक्ष्यांना सहजतेने पाणी उपलब्ध होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात पशू-पक्ष्यांसाठी सामूहिक पाणपोईचा उपक्र म हाती घेतला आहे.

पंचवटी : उन्हामुळे दिवसेंदिवस उष्णतेच्या झळा वाढत चालल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मनुष्य पिण्याच्या स्वच्छ पाण्याची कुठूनही सोय करू शकतो; परंतु तहान भागवण्यासाठी पशू-पक्ष्यांना सहजतेने पाणी उपलब्ध होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरात पशू-पक्ष्यांसाठी सामूहिक पाणपोईचा उपक्र म हाती घेतला आहे.  उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात पक्ष्यांना दूरवर भटकंती करावी लागते, तर काही वेळेस पाण्याअभावी त्यांचा मृत्यू होतो. उन्हाळा जाणवू लागल्याने पाण्याचे साठे आटू लागले आहेत. शहरातही पाणीटंचाई सुरू झाली आहे. उष्म्यामुळे तहान वाढली आहे. मनुष्य पाणी पिण्याची सोय करू शकतो; परंतु भटके श्वान, मांजर, खारु ताई, चिमणी, कावळा, साळुंकी, कबूतर यांसारख्या विविध पशू-पक्ष्यांना तहान भागवण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय नसतेच.  शहरातील आवश्यक ठिकाण निवडून तेथे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. या उपक्र माला हिरावाडी रोडवरील त्रिमूर्तीनगर येथे उपाध्यक्ष दीपक पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली. पाणी ठेवण्यासाठी मोठा आकारअसलेली सीमेंटची भांडी शहरातील आवश्यक ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनीदेखील आपापल्या परीने बाल्कनी, बगीचा, घरासमोरील अंगणात पक्षी व शक्य झाल्यास  पशूंसाठी पाणी व अन्नाची सोय  करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  याप्रसंगी शहराध्यक्ष अंबादास खैरे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. चिन्मय गाढे, दीपक पाटील, नीलेश कर्डक, भूषण गायकवाड, कमलाकर गोडसे, सुशांत कुºहे, संतोष पुंड, प्रकाश भोर, रोहित जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी