शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून १८ गावांत पाणी: प्रमोद गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:03 IST

नाशिक- सोशल नेटवर्कींगचा उपयोग हा विधायक कामासाठी उपयोग होऊ शकतेा, याच जाणिवेतून सुरू झालेल्या चळवळीला चांगले यश लाभत आहे. वर्षानुवर्षे पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या १८ गावांना किमान पिण्यासाठी पाणी देऊन त्यांची समस्या दुर करण्यात या चळवळीला यश आले आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख प्रमोद गायकवाड यांनी दिली. 

ठळक मुद्देविधायक उपक्रमाने बळकुपोषण, शिक्षणासाठीही कार्य

नाशिक- सोशल नेटवर्कींगचा उपयोग हा विधायक कामासाठी उपयोग होऊ शकतेा, याच जाणिवेतून सुरू झालेल्या चळवळीला चांगले यश लाभत आहे. वर्षानुवर्षे पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या १८ गावांना किमान पिण्यासाठी पाणी देऊन त्यांची समस्या दुर करण्यात या चळवळीला यश आले आहे, अशी माहिती संस्थेचे प्रमुख प्रमोद गायकवाड यांनी दिली. 

प्रश्न- सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ गावात पाणी आल्यानंतरच जल्लोष झाल्याचा विषय व्हायरल झाला आहे. ही किमया कशी घडली?

गायकवाड- सुरगाणा तालुक्यातील म्हैसमाळ हे गाव पाणी टंचाईमुळे अत्यंत अडचणीत होते. दुरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्याची दखल मिडीयात घेतली जात हेाते. त्यामुळे सोशल नेटवर्कींग फोरमने गेले दीड वर्षे या परीश्रम घेतले आणि पाणी प्रश्न सेाडवला. या गावापासून अवघ्या अडीच किलो मीटर अंतरावर वर्षभर पाणी असणारे धरण होते. त्याजवळच एक विहीर खोदली आणि तेथे खूप पाणी लागल्याने चर खेादून श्रमदानातून पाणी गावात आणले. काही सेवाभावी संस्थेच्या मदतीने पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्यामुळे या गावााचा पाणी प्रश्न सुटला. आत्तापर्यंत १७ गावात पाणी आणण्यात आले होते आणि हे अठरावं गाव होतं.

प्रश्न-सेाशल नेटवर्कींग फेारमची चळवळ कशी सुरू झाली?

गायकवाड- सोशल मिडीयाचा वापर हा विधायक कामासाठी झाला पाहिजे या उद्येशाने २०१० मध्येच सोशल नेटवर्कींग फेारम फॉर सोशल कॉज ही चळवळ सुरू केली. २०१२ मध्ये त्याला संस्थात्मक स्वरूप दिले. आरोग्य शिक्षण आणि पाणी यासंदर्भात तेव्हापासून लक्ष केंद्रीत केले आहे.

प्रश्न- कुपोषणाबाबत संस्थेने काय काय उपक्रम राबवले?

गायकवाड- २०१७ मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुपोषणाची समस्या गंभीर झाल्याने एका गावात स्त्री रोग तज्ज्ञ आणि बाल रोग तज्ज्ञांच्या मदतीने फेारमने काम केले. याठिकाणी ३५२ कुपोषीत मुले होती. त्यातील २८२ मुले कुपोषणाबाहेर आली. कुपोषण हे सरकारी पध्दतीने त्याच त्या पध्दतीचा पोषण आहार देऊन कमी होणार नाही तर त्यासाठी वेगळे काम केले पाहिजे यासाठी एक अहवाल करून केंद्र सरकारला सादर केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून वीस गावातही कुपोषणमुक्तीसाठी काम सुरू आहे. याशिवाय डिजीटल  शिक्षणासाठी देखील दहा ते बारा गावांना संगणक आणि अन्य साहित्य पुरवले आहे. संगणक साक्षरतेसाठी मेाहिम देखील हाती घेण्यात आली. 

 

 

टॅग्स :NashikनाशिकSocial Mediaसोशल मीडियाwater scarcityपाणी टंचाई