शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया न करताच सांडपाणी गोदावरीत, पर्यावरणप्रेमींकडून टीकेची झोड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 11:35 IST

सांडपाणी थेट गोदेत जात असल्याने नदीपात्रातील बायो ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण जवळपास 30 पेक्षा अधिक आहे.

नाशिक : नाशकातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते नदीत सोडले जात असल्याचा दावा पालिकेकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मलनिस्सारण केंद्रे नावालाच असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. त्यामुळे गोदावरी प्रदूषित झाली आहे.शहराच्या सांडपाणी व्यवस्थापन आराखड्यानुसार महापालिकेकडून आठ विभाग करण्यात आले आहेत. यातील चार विभागांतील मलनिस्सारण केंद्रे कार्यान्वित असून, पाचवे केंद्रही लवकरच सुरू होणार आहे, तसेच सहाव्या केंद्र्राच्या उभारणीसाठी पिंपळगाव खांब येथे भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे. सुरू असलेल्या चार केंद्रांची एकूण क्षमता ३४२.५० एमएलडी इतकी आहे. सर्व मलनिस्सारण केंद्रांमधील यंत्रणा कुचकामी झाली असून, सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता, पाणी तसेच नदीपात्रात सोडले जाते, असा आरोप पर्यावरणतज्ज्ञांमधून केला जात आहे. सांडपाणी थेट गोदेत जात असल्याने नदीपात्रातील बायो ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण जवळपास 30 पेक्षा अधिक आहे. हे प्रमाण सुधारित निकषानुसार 10 असणे गरजेचे आहे. भुयारी गटार अन् पावसाळी गटारींचा गुंताजवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत महापालिकेने शहरात भुयारी गटार आणि भुयारी पावसाळी गटार योजनेची कामे केली. ठिकठिकाणी भुयारी गटारी या थेट पावसाळी गटारीला जोडण्यात आलेल्या आहेत.पावसाळी गटारी थेट गोदावरीत सोडल्या आहेत. या गटारींमुळे पावसाच्या पाण्याबरोबरच सांडपाणीही गोदापात्रात मिसळते. या गटारींचा गुंता सोडविण्याची सूचनाही निरीने महापालिकेला केली आहे. अद्याप हा गुंता सुटलेला नाही. अत्याधुनिक यंत्रणेची उभारणी गरजेची : तपोवन, आगरटाकळी, पंचक, चेहडी, नांदूर दसक, गंगापूर याठिकाणी एसटीपी प्रकल्प कार्यान्वित आहेत. या एसटीपींची यंत्रणा जुनाट असून, ती आधुनिक करण्याची गरज आहे, तरच मलजलावर प्रक्रिया यशस्वी होऊन नदीपात्रात मिसळणारे पाणी प्रदूषणविरहित असेल, असे ‘निरी’चे म्हणणे आहे.  गोदेच्या खोऱ्यातील जमीन सुपीक मानली जाते. गोदावरीचे सर्वाधिक प्रदूषण सांडपाणी व औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक द्रव्येमिश्रित पाण्यामुळे होत आहे. त्याचे गंभीर परिणाम मानवी आरोग्यासह जलचर जैवविविधतेवर होत आहेत. - राजेश पंडित, याचिकाकर्ता 

टॅग्स :pollutionप्रदूषणgodavariगोदावरीNashikनाशिक