शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अनर्थ टळला : इंदिरानगर, वडाळागावात प्लॅस्टिक भंगार वस्तूंना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:34 IST

भूखंडावरील वाळलेल्या गवतानेही पेट घेतला होता. कचरा पेटला असल्याचा विचार करत सुरुवातीला या आगीकडे परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष केले; मात्र आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला.

ठळक मुद्देआगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केलावडाळ्यातही कचऱ्याने घेतला पेट

नाशिक : परिसरातील श्रद्धाविहार कॉलनीजवळ असलेल्या नाल्याला लागून असलेल्या भूखंडावर अज्ञात गॅरेजचालकांनी भंगार मालाचा कचरा बेवारस स्थितीत रात्रीच्या सुमारास फेकला. या कचऱ्याने दुपारीस साडेबारा वाजेच्या सुमारास अचानकपणे पेट घेतला. प्लॅस्टिकचे मोठे तुकडे असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उठल्याने परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान बंंबासह घटनास्थळी दाखल झाले.रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने भंगार छाननी करण्याच्या उद्देशाने प्लॅस्टिकचा भंगार पेटविल्याचे बोलले जात आहे. यामुळे भूखंडावरील वाळलेल्या गवतानेही पेट घेतला होता. कचरा पेटला असल्याचा विचार करत सुरुवातीला या आगीकडे परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष केले; मात्र आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला. घटनास्थळ सैन्याच्या छावणीच्या संरक्षक कुंपणाजवळ असल्यामुळे टेहळणीवर असलेल्या जवानांनी धोका लक्षात घेत पाणी फेकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग विझली नाही. यावेळी नागरिकांनी परिसरातील नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. बडोदे यांनी तत्काळ अग्निशमन मुख्यालयाशी संपर्क साधत मदत मागितली. अवघ्या काही मिनिटांत सिडको उपकेंद्राचा बंब घेऊन जवान घटनास्थळी पोहचले. पाण्याचा मारा करत जवानांनी आग पंधरा ते वीस मिनिटांत आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

 

वडाळ्यातही कचऱ्याने घेतला पेटवडाळागावातील श्रीश्री रविशंकर मार्गावरील तैबानगरजवळ असलेल्या एका पडीक बांधकामाच्या जागेत असलेला प्लॅस्टिक कचºयाचा ढीग अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने मोठी आग लागली होती. प्लॅस्टिक भंगार वस्तूंचा कचरा पेटल्यामुळे काळाकुट्ट धूर आकाशात दिसत होता. तसेच आगीच्या ज्वालाही धगधगत होत्या. पडीक बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक भिंत असल्यामुळे आग पसरली नाही. या पडीक बांधकामाला लागून नागरिकांची घरे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आगीवर पाणी टाकून आग विझविली. या पडीक जागेत परिसरातील गॅरेजधारक, भंगार मालाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक कचरा आणून टाकत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. महापालिकेने उघड्यावर कचरा, तसेच टाकाऊ साहित्य फेकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलfireआग