शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सतर्कतेचा इशारा : गंगापूरमधून लवकरच होणार हंगामातील पहिला विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:54 IST

नाशिक : यंदा पावसाला उशिरा सुरूवात झाली असली तरी जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गंगापूर धरण ८० टक्क्यांपर्यंत ...

ठळक मुद्दे१००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.गोदापात्रात २ हजार ४३८ क्युसेक पाणी गोदावरीत प्रवाहित होणार आहे.विसर्ग हळहळु सायंकाळपर्यंत २००० क्युसेकपर्यंत वाढविला जाणार आहे.

नाशिक : यंदा पावसाला उशिरा सुरूवात झाली असली तरी जुलै महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गंगापूर धरण ८० टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून सोमवारी (दि.२९) दुपारी १००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. हा विसर्ग हळहळु सायंकाळपर्यंत २०००पर्यंत वाढविला जाणार आहे. त्यामुळे होळकर पूलाखालून गोदापात्रात २ हजार ४३८ क्युसेक पाणी गोदावरीत प्रवाहित होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. गोदाकाठी असलेल्या रहिवाशांना तसेच विक्रेत्यांना तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आदेश दिले गेले आहे. तसेच गोदाकाठालगत सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.गंगापूर धरणातून विसर्ग झाल्यानंतर होळकर पुलापर्यंत पाणी दीड तासांत पोहचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. होळकर पूलापासून पुढे नदीपात्र उथळ असल्यामुळे पाणी उसळ्या घेऊन अधिक वेगाने टाळकुटेश्वर व लक्ष्मीनारायण पुलाखालून वाहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी तत्काळ गोदापात्रापासून सुरक्षितस्थळी निघून जावे, असे आवाहन केले जात आहे. आपली दुकाने, वाहने गोदापात्रापासून तत्काळ काढून घ्यावी असे आवाहन महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे. गोदापात्रात वाढलेले पाणी बघण्यासाठी व फोटोसेशन करण्यासाठी कोणीही पुलांवर गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. अहल्यादेवी होळकर पूल, संत गाडगे महाराज पूल, लक्ष्मीनारायण पुलावर बघ्यांनी गर्दी करू नये, तसेच सेल्फी वगैरे घेण्याचा धोकादायक प्रयत्न करू नये असे आवाहन उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण झाल्यास पुलावर उभ्या केलेल्या वाहनांच्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा या तीनही पोलीस ठाण्यांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त घारपुरे घाट ते तपोवनापर्यंत नदीकाठालगत व पुलांवर असणार आहे. या हंगामातील हा पहिलाच विसर्ग नदीपात्रात होत आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ४ हजार ४२२ दलघफूपर्यंत पोहचला आहे. गंगापूर पाणलोट क्षेत्रात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे. सकाळनंतर पावसाचा जोर अधिक वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला आहे.

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलgangapur damगंगापूर धरणgodavariगोदावरीRainपाऊस