शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

महिलांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:38 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील कायम दुर्लक्षित असणारे शिरसाटे गाव. १२०० च्या जवळपास लोकसंख्या. गावात ६४ लाख रुपयांच्या खर्चाची नळ ...

घोटी : इगतपुरी तालुक्यातील कायम दुर्लक्षित असणारे शिरसाटे गाव. १२०० च्या जवळपास लोकसंख्या. गावात ६४ लाख रुपयांच्या खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर असून, पाणीपुरवठा करणारी विहीरही खोदून तयार आहे.तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खोदलेली विहीर या योजनेसाठी  नको म्हणून नवीन पदाधिकाऱ्यांनीनव्या विहिरीसाठी पाठपुरावा सुरू केला  आहे.  वाढत्या अंतर्गत राजकारणामुळे बांधलेल्या विहिरीला पाणी असूनही शिरसाटे ग्रामस्थांना पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो आहे. अनेकांनी या वादात मध्यस्थी  करूनही प्रश्न अद्याप अनुत्तरितच  आहे.ग्रामस्थांसाठी पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला असून, टँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. गावापासून विहीर एक किमीवर आहे. महिलांना वर्षभर पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. उन्हाळ्यात महिला तर जास्तच मेटाकुटीला येतात.टॅँकरवर भागते गावाची तहानइगतपुरी तालुक्यातील डोंगराळ भागात शिरसाटे गाव आहे. काही वर्षांपूर्वी या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ६४ लाख रु पये खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. तत्कालीन सरपंच जनाबाई सदगीर यांनी सांजेगाव धरणाजवळ विहिरीसाठी जागा घेऊन स्वखर्चाने विहीर खोदली. या विहिरीला पुरेसा पाणीसाठा आहे. मधल्या काळात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. जुने पदाधिकारी जाऊन नव्या पदाधिकाºयांनी ग्रामपंचायतीत सत्ता संपादन केली. जुन्या पदाधिकाºयांनी केलेल्या कामाबाबत नव्या पदाधिकाºयांनी असमाधान दाखवून खोदलेली विहीर नाकारली व नव्याने विहीर खोदकाम सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले; मात्र या नव्या-जुन्याच्या वादामुळे ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत. अनेकांनी या वादात केलेली मध्यस्थी निष्फळ ठरली आहे.४शिरसाटेची भीषण पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनानेगावात टँकर सुरू केलेला आहे. गावापासून एक किमी दूर असलेल्या सार्वजनिक विहिरीत टॅँकरचे पाणी टाकले जाते. एक टँकर गावासाठी कमी पडत असल्याने महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्याचा शोध घ्यावा लागतो. तहान भागविण्यासाठी सरकारी टँकरचा आधार घेतला जात असला तरी, या पाण्यामुळे गावकरी आजारी पडत आहेत, अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिली. यामुळे या गावातील पाण्याचे संकट आता अधिकच भीषण होत चालले आहे. जनावरांच्या चाºयाचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे. पाण्याशिवाय माणसांनी व जनावरांनी जगायचे कसे व करायचे काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शिरसाटे गावातील जनतेला भीषण दुष्काळाची दाहकता सोसावीलागत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी