शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

आदिवासी बांधवांची पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 21, 2017 00:58 IST

शासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम सुफलाम आणि विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे.

मनोज देवरे कळवणशासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम सुफलाम आणि विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे. परंतु वास्तव मात्र वेगळेच आहे. ज्या आदिवासी बांधवांनी तालुक्यात जलाशयाचे प्रकल्प व्हावेत म्हणून आपल्या जमिनी दिल्या त्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. पाण्यासाठी शासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी नाही. गावातील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी भटकण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण हा तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे. मात्र पुनंद आणि ओतूर खोऱ्यातील डोंगरकपारीतील आदिवासी वस्ती-पाडे व गाव-वस्तींना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत; परंतु विहीर तसेच विंधनविहिरींना पाणी नाही.

दुग्धव्यवसायावरदेखील परिणामतालुक्यातील दुग्धव्यवसायावर यंदाच्या दुष्काळाची वक्र दृष्टी पडलेली दिसून येत आहे. अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी, नाले, कोल्हापूर टाइप बंधारे कोरडे पडण्यास सुरु वात झाली आहे. अपुऱ्या पाण्यामुळे पिकावर अनिष्ठ परिणाम झाला असून, चाराटंचाई निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम पशुपालन व त्यावर अवलंबून असलेल्या दुग्धव्यवसायावरही झालेला दिसून येतो. दुग्धव्यवसाय मंदीत आला असून, परिणामी बाजारात दुधाचे भाव वाढले आहेत. कमी पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यापासून मिळणाऱ्या चाऱ्याचा तुटवडा भासत आहे. परिसरातील काही भागात जनावरांना पिण्यासाठी पाणीदेखील उपलब्ध नाही, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे.नागरिकांनी करायचे काय?४शासनाने गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या दुरु स्तीबरोबर बंधारे बांधले तर भविष्यातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. भरपूर पाऊस पडायचा, गिरणा, बेहडी, पुनंद नदी वाहायची. काळ लोटला, लोकसंख्या वाढली, गरजेनुसार पाणीयोजना झाल्या आणि नवीन धरणे व प्रकल्पही झाले. आता बारमाही नुकसानीचे प्रमाण कमी झाले असले तरी पावसाळ्यातील पर्जन्यमान कमी झाले. नदीला पूर येत नाही. चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प तसेच लहान- मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले की मग नदीत पाणी सोडले जाते. आज पाणीटंचाई निर्माण झाली तर कळवण तालुक्यातील जनतेला पाणी असून मिळणे दुरापास्त झाले आहे. कारण पाण्यावर अधिकार कळवणकर जनतेऐवजी मालेगावकरांचा असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली तर कळवण तालुक्यातील जनतेने करायचे काय, असा प्रश्न निर्माण होणार आहे.