शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांना भिंत म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 01:42 IST

राज्यात ज्या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे गंमत आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.

ठळक मुद्देमनसेने उडवली खिल्ली: संदीप देशपांडे म्हणाले, शिवरायांचे समुद्रातील स्मारक गेले कुठे?

नाशिक : राज्यात ज्या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे गंमत आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.

मिशन नाशिक महापालिकेसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे बुधवारी (दि. २८) नाशिकच्या दौऱ्यावर आले असून, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना देशपांडे यांनी राज्य सरकाच्या भिंत प्रकरणाची खिल्ली उडवली. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारून त्यावर पुतळा उभारण्यात येेणार होता. तो पुतळा उभारू शकले नाहीत आणि भिंत काय उभारणार, असा प्रश्न देशपांडे यांनी केला. राज ठाकरे यांनी अगोदरच गड, किल्ले संवर्धनाचे महत्व सांगितले होते, असेही ते म्हणाले.

काेकणातील पुराच्या विषयावर बोलताना देशपांडे म्हणाले, हे प्रशासनाचे फेल्युअर आहे. कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे लोकांना दिले नाहीत. निक्रिय लोकांच्या हाती सत्ता असल्याने नियोजन नाही की, मदत करण्याची एसओपी तयार नव्हती. तसेच आता मदत घोेषित केली तरी पॅकेज जाहीर करून उपयोग नाही, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले.

इन्फो...

शिवसेनेची आधी, जाहिरात मग मदत

शिवसेनेने पूरग्रस्तांना मदत केली. त्यावर बोलताना आधी जाहिरात केली, मग मदत केली, असा टोला लगावून मनसे शंभर ते सव्वाशे ट्रक मदत करत असल्याचेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे