शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

शुल्कमाफीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:14 IST

शिक्षण संस्था पैशाच्या जोरावर अवास्तव माहिती सादर करून न्यायालयाची दिशाभूल करीत त्यांना अनुकूल निर्णय पदरात पाडून घेतात; परंतु या ...

शिक्षण संस्था पैशाच्या जोरावर अवास्तव माहिती सादर करून न्यायालयाची दिशाभूल करीत त्यांना अनुकूल निर्णय पदरात पाडून घेतात; परंतु या विरोधात नाशिक पॅरेंट्स असोसिएशनसह राज्यातील पुणे, मुंबई येथील काही पालकांनीही अखेरपर्यंत सर्वोच्च न्यायालयात शुल्कमाफीसाठी पाठपुरावा केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारला कोरोना काळातील शुल्कवाढ रद्द करण्यासोबतच १५ टक्के सरसकट शुल्क कपात करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने शाळांनी शुल्कवाढ करू नये, असा शासन निर्णय काढला होता, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती देत शाळांना शुल्कवाढीची परवानगी दिली होती; मात्र याच काळात राजस्थानच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १५ टक्के शुल्ककपातीचा आदेश दिला होता. या निर्णयाच्या आधारे महाराष्ट्रातील पालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात राजस्थान प्रकरणाचा निर्णय ग्राह्य धरून महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा, असे आदेशित केले; मात्र शिक्षण संस्था चालकांकडून या निर्णयाविरोधातही स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे संस्थाचालकांनी पुन्हा पालकांची कोंडी करण्यापूर्वी शुल्ककपातीसंदर्भातील निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

दरम्यान,शासनाने शुल्क नियंत्रणासंदर्भात तक्रार करण्याच्या पालकांच्या अधिकारांवरही मर्यादा आणली आहे. अन्यायाविरोधात कोणीही उभा राहू शकतो, परंतु शासनाने शाळांविरोधात तक्रारीसाठी किमान २५ टक्के पालक संमतीची अट घालण्यासोबतच बाह्यघटकांना आंदोलन करण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे एकप्रकारे तत्कालिन शिक्षणमंत्र्यांनी संस्थाधार्जिने धोरण स्वीकारत पालकांवर अन्यायच केला आहे. एकट्या पालकांना बाह्य संघटनांचे पाठबळ मिळाले नाही तर शाळांकडून वेगवेगळ्या प्रकारची भीती घालून गप्प केले जाते. याला प्राथमिक असो किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी जबाबदार आहे. अधिकारी पालकांच्या तक्रारीला दाद देत नाहीत. त्यांचे वेळकाढू धोरण संस्थाचालकांची हिम्मत वाढविणारे ठरते; मात्र पालकांनी घाबरून न जाता संयमाने कायदेशीर लढा देण्याची गरज आहे. हेच सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.