शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
3
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
4
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
5
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
6
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
7
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
8
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
9
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
10
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
11
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
12
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
13
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
15
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
16
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
17
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
18
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
19
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
20
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 18:43 IST

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणार्या चणकापूर व पुनंद प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देपावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणार्या चणकापूर व पुनंद प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.1973 सालात प्रथमच चणकापूर प्रकल्प कोरडाठाक झाला होता. तर पुनंद प्रकल्पात मृतसाठा होता. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य हवालिदल झाले होते. मात्र 21 ते 31 जुलै 2019 दरम्यान कोसळधार झालेल्या पावसाने या प्रकल्पांमध्ये पाणी साठ्यात वाढ झाल्याने हजारो दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यांसह 82 गावातील पाणीयोजनांना संजीवनी मिळाली होती. तर या पावसाने तालुक्यातील धनोली, भेगू, गोबापूर, माळेगाव, बोरदैवत, मार्कंडपिंपरी, धार्डेदिगर, खिराड, ओतूर, भांडणे, जामलेवणी, नांदूरी हे लघूप्रकल्प पूर्णक्षमतेने भरले होते. यंदा 2814 दलधफू क्षमतेच्या चणकापूर प्रकल्पात आजअखेर 590 दलधफू पाणी साठा असून 320 मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी या काळात 365मिमी पाऊस, तर पाणीसाठा 1191 दलघफू होता. दरम्यान, गिरणा नदीपात्रातून 2500 क्युसेकने तर चणकापूर उजव्या कालव्यातून 60 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तसेच 1404 दलघफू क्षमतेच्या पुनंद प्रकल्पात आजअखेर 422 दलघफू साठा असून गतवर्षी या काळात 653 दलघफू पाणीसाठा होता. त्यातूनही मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरु होता. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील लघु सिंचन प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य वरूणराजाच्या कोसळण्याची आस बाळगून आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरण