शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मुंबई महामार्गाची खड्ड्यातून वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:02 IST

मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ कॉलेज ते कोणार्कनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील चौफुल्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना वाहनचालकांना उड्डाणपुलाच्या कामामुळे आता अडथळा, वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा तिहेरी संकटातून मार्गक्रमण करावे लागत आहे.

पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ कॉलेज ते कोणार्कनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील चौफुल्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना वाहनचालकांना उड्डाणपुलाच्या कामामुळे आता अडथळा, वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा तिहेरी संकटातून मार्गक्रमण करावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही समस्या वाहनचालकांना भेडसावित असताना राष्टय महामार्ग प्राधिकरण व काम करणाऱ्या ठेकेदाराकडून काहीच उपाययोजना केली जात नसल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत.गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर बहुतांश ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजविले गेले नसल्यामुळे व त्यातच रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ कायम असल्याने खड्ड्यांमध्ये वाढ झाली.काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. औरंगाबाद नाका, मीनाताई ठाकरे स्टेडियमसमोरील सर्व्हिसरोड, के. के. वाघ कॉलेज, अमृतधाम चौफुली, हनुमाननगर, जुने बळी मंदिर परिसर, बहिणाबाई चौधरी कॉलेज, जत्रा हॉटेल, कोणार्कनगर या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेलेआहेत.वाहनचालकांची कसरतउड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील चौफुल्यांवर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना आता वाहनचालकांना उड्डाणपुलाच्या कामाचा अडथळा तर आहेच शिवाय वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे अशा तिहेरी संकटातून वाहनचालकांची कसरत सुरू आहे.४ एका बाजूला टोल कंपनीकडून वाहनचालकांकडून कोट्यवधी रुपये टोल स्वरूपात वसूल केले जात असताना खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात मात्र टोल कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार केली जात आहे. याप्रश्नी लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गNashikनाशिक