शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

मालेगावकरांना प्रतीक्षा नवीन गिरणा पुलाची

By admin | Updated: July 6, 2014 00:09 IST

मालेगावकरांना प्रतीक्षा नवीन गिरणा पुलाची

मालेगाव : शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या येथील जुन्या व अरुंद अशा गिरणा पुलावरील वाहतूक ही दिवसेंदिवस धोकेदायक, वाहतूक कोंडी करणारी व वेळकाढू ठरत आहे. दुसरीकडे या पुलाला समांतर अशा नवीन पुलाचे बांधकाम शासकीय क्लिष्ट प्रक्रियेमुळे दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील नवीन पुलाच्या कामाच्या भूमिपूजनाची शोबाजी व पत्रकबाजी करणाऱ्यांनी या पुलाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्वसामान्य मालेगावकर जनता व प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.मालेगावहून पुणे, नाशिक, मुंबई ये-जा करण्यासाठी शहराच्या वेशीवर गिरणा नदीवर ब्रिटिशकालीन गिरणा पूल आहे. या पुलाने शंभरी गाठली आहे. सदर जुन्या गिरणा पुलाची अवस्था बिकट झाली आहे. तरीही या पुलाचा वापर अद्यापही सुरू आहे. या पुलावर दोन्ही बाजूने वाहने आल्यास त्वरित वाहतूक कोंडी व लहान-मोठे अपघात होतात. पुलाचे संरक्षक कठडेही काही ठिकाणी तुटले आहेत. शहर तालुकावासीयांतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी करण्यात येत होती. त्यास महत्प्रयासाने मान्यता मिळाल्यानंतर गेल्यावर्षी या पुलाच्या कामास हिरवा कंदील मिळाला. नदीपात्रातून नवीन पुलासाठी सर्वेक्षण करण्यात आले.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्याअगोदर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाभरात उद्घाटने, भूमिपूजन करण्याचा सपाटा लावला होता. त्यात नांदगाव व मालेगाव तालुक्यातील अनेक विकासकामांचा समावेश होता. त्याअंतर्गत पूल उभारणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले. जुन्या पुलाच्याच पुढ्यात कोनशीला उभारली. मात्र त्यानंतर कुठलीही शासकीय यंत्रणा येथे फिरकली नाही. एवढ्या घाईने भूमिपूजन झाल्यावर पुलाचे काम त्वरित सुरू होईल, असे शहरवासीयांचे स्वप्न होते; परंतु कासवगतीने पुलाच्या असंख्य फायलींचा प्रवास सुरू आहे. यात पुलाची डिझाईन, निविदा प्रक्रियेचा समावेश आहे. विविध बांधकाम कंपन्यांशी ‘चर्चेचे गुऱ्हाळ’ सुरू असल्याचीही चर्चा आहे.सध्या मोतीबाग नाका ते जुन्या गिरणापुलापर्यंत दोघेही बाजूने रस्त्याचे रुंदीकरण सुरू झालेले आहे. तांत्रिकदृष्ट्या जुन्या गिरणा पुलाचे वयोमान कधीच संपले असल्याने त्याला समांतर असा नवीन पूल बांधण्यासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न सर्वसामान्य मालेगावकर व जनतेकडून करण्यात येत आहे.