शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:41 IST

आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे. यावरून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य समोर आले आहेच आता रब्बी हंगामाचीही चिंता असल्याने शेतकऱ्यांना निदान खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे.

नाशिक : आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे. यावरून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य समोर आले आहेच आता रब्बी हंगामाचीही चिंता असल्याने शेतकऱ्यांना निदान खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्यातील संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतामध्ये पाणी साचल्यामुळे नुकसानीचे क्षेत्र मोठे असण्याची शक्यता तेव्हाच वर्तविली जात होती. जिल्हा प्रशासनाने ३ लाख ८६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. आता पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पीक नुकसानीचा आकडा तब्बल साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे.नुकसानीचे एकूणच गांभीर्य लक्षात घेता सरसकट पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने पुढे येत आहेच शिवाय बाधीत शेतकºयांच्या कर्जमाफीचा मुद्दाही जोर धरू लागला आहे. राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नसले तर मागील सरकारने दहा हजार कोटींची तरतूद केली आहेच उर्वरित भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळविण्यासाठीचे प्रयत्न राजकीय नेत्यांनी सुरू केले आहेत. नुकसानीचा आकडा पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षाही तत्काळ मदतीसाठी केंद्राचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.जिल्हातील महत्त्वाचे पीक असलेल्या द्राक्षाचे मोठे नुकसान झालेले आहे. याबरोबरच मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कांदा यासह अन्य पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार १ हजार ९५९ गावातील ७ लाख ७६ हजार ९७० शेतकरी बाधीत झाले आहे.प्रशासनाकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू होते. त्यापैकी ३ लाख ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर गेला आहे.६३६ कोटींच्या मदतीची गरजजिल्ह्यातील शेतपीकांच्या नुकसानीसाठी सुमारे ६३६ कोटी २३ लाख ३३ रुपयांच्या मदतीची गरज असून तसा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. जिरायतीसाठी २७८ कोटी ३० लाख, बागायत पिकांसाठी २११ कोटी ७ हजार तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १४६ कोटी २८ लाख असे एकूण जवळपास ६३६ कोटी २३ लाख ३३ रुपयांच्या मदतीची अपेक्षा आहे.क्षेत्रानुसार नुकसानीचा अंदाजजिरायत क्षेत्र : ४ लाक ९ हजार २७५ हेक्टर (१९५८ गावांमधील ५ लाख५३ हजार ४८४ शेतकरी बाधीत)बागायती क्षेत्र : १ लाख ५६ हजार ३५० हेक्टर (१ हजार ३६१ गावांमध्ये झाले असून, तेथील २ लाख ३० हजार ७७ शेतकरी बाधीत.बहुवार्षिक फळपिके : ८१ हजार २७० हेक्टर (१२१५ गावे व १ लाख ४ हजार ३६५ शेतकरी बाधीत)तालुकानिहाय नुकसानाची आकडेवारी (हेक्टरमध्ये)नाशिक : १२ हजार ७३२इगतपुरी : १४ हजार ९८त्र्यंबकेश्वर : ०८ हजार ५२दिंडोरी : २४ हजार ५७१पेठ : १३ हजार ६८३कळवण : २९ हजार २५३सुरगाणा : २२ हजार ८११बागलाण : ७४ हजार २४८चांदवड : ५७ हजार ७७२देवळा : ३९ हजार १५८मालेगाव : १ लाख १४ हजार ९४३येवला : ५८ हजार ४१३नांदगाव : ५६ हजार ९४३निफाड : ६३ हजार ८०७सिन्नर : ५१ हजार ७३१

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस