शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:41 IST

आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे. यावरून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य समोर आले आहेच आता रब्बी हंगामाचीही चिंता असल्याने शेतकऱ्यांना निदान खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे.

नाशिक : आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे. यावरून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य समोर आले आहेच आता रब्बी हंगामाचीही चिंता असल्याने शेतकऱ्यांना निदान खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्यातील संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतामध्ये पाणी साचल्यामुळे नुकसानीचे क्षेत्र मोठे असण्याची शक्यता तेव्हाच वर्तविली जात होती. जिल्हा प्रशासनाने ३ लाख ८६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. आता पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पीक नुकसानीचा आकडा तब्बल साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे.नुकसानीचे एकूणच गांभीर्य लक्षात घेता सरसकट पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने पुढे येत आहेच शिवाय बाधीत शेतकºयांच्या कर्जमाफीचा मुद्दाही जोर धरू लागला आहे. राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नसले तर मागील सरकारने दहा हजार कोटींची तरतूद केली आहेच उर्वरित भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळविण्यासाठीचे प्रयत्न राजकीय नेत्यांनी सुरू केले आहेत. नुकसानीचा आकडा पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षाही तत्काळ मदतीसाठी केंद्राचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.जिल्हातील महत्त्वाचे पीक असलेल्या द्राक्षाचे मोठे नुकसान झालेले आहे. याबरोबरच मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कांदा यासह अन्य पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार १ हजार ९५९ गावातील ७ लाख ७६ हजार ९७० शेतकरी बाधीत झाले आहे.प्रशासनाकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू होते. त्यापैकी ३ लाख ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर गेला आहे.६३६ कोटींच्या मदतीची गरजजिल्ह्यातील शेतपीकांच्या नुकसानीसाठी सुमारे ६३६ कोटी २३ लाख ३३ रुपयांच्या मदतीची गरज असून तसा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. जिरायतीसाठी २७८ कोटी ३० लाख, बागायत पिकांसाठी २११ कोटी ७ हजार तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १४६ कोटी २८ लाख असे एकूण जवळपास ६३६ कोटी २३ लाख ३३ रुपयांच्या मदतीची अपेक्षा आहे.क्षेत्रानुसार नुकसानीचा अंदाजजिरायत क्षेत्र : ४ लाक ९ हजार २७५ हेक्टर (१९५८ गावांमधील ५ लाख५३ हजार ४८४ शेतकरी बाधीत)बागायती क्षेत्र : १ लाख ५६ हजार ३५० हेक्टर (१ हजार ३६१ गावांमध्ये झाले असून, तेथील २ लाख ३० हजार ७७ शेतकरी बाधीत.बहुवार्षिक फळपिके : ८१ हजार २७० हेक्टर (१२१५ गावे व १ लाख ४ हजार ३६५ शेतकरी बाधीत)तालुकानिहाय नुकसानाची आकडेवारी (हेक्टरमध्ये)नाशिक : १२ हजार ७३२इगतपुरी : १४ हजार ९८त्र्यंबकेश्वर : ०८ हजार ५२दिंडोरी : २४ हजार ५७१पेठ : १३ हजार ६८३कळवण : २९ हजार २५३सुरगाणा : २२ हजार ८११बागलाण : ७४ हजार २४८चांदवड : ५७ हजार ७७२देवळा : ३९ हजार १५८मालेगाव : १ लाख १४ हजार ९४३येवला : ५८ हजार ४१३नांदगाव : ५६ हजार ९४३निफाड : ६३ हजार ८०७सिन्नर : ५१ हजार ७३१

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस