शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:41 IST

आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे. यावरून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य समोर आले आहेच आता रब्बी हंगामाचीही चिंता असल्याने शेतकऱ्यांना निदान खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे.

नाशिक : आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे. यावरून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य समोर आले आहेच आता रब्बी हंगामाचीही चिंता असल्याने शेतकऱ्यांना निदान खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्यातील संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतामध्ये पाणी साचल्यामुळे नुकसानीचे क्षेत्र मोठे असण्याची शक्यता तेव्हाच वर्तविली जात होती. जिल्हा प्रशासनाने ३ लाख ८६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. आता पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पीक नुकसानीचा आकडा तब्बल साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे.नुकसानीचे एकूणच गांभीर्य लक्षात घेता सरसकट पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने पुढे येत आहेच शिवाय बाधीत शेतकºयांच्या कर्जमाफीचा मुद्दाही जोर धरू लागला आहे. राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नसले तर मागील सरकारने दहा हजार कोटींची तरतूद केली आहेच उर्वरित भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळविण्यासाठीचे प्रयत्न राजकीय नेत्यांनी सुरू केले आहेत. नुकसानीचा आकडा पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षाही तत्काळ मदतीसाठी केंद्राचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.जिल्हातील महत्त्वाचे पीक असलेल्या द्राक्षाचे मोठे नुकसान झालेले आहे. याबरोबरच मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कांदा यासह अन्य पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार १ हजार ९५९ गावातील ७ लाख ७६ हजार ९७० शेतकरी बाधीत झाले आहे.प्रशासनाकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू होते. त्यापैकी ३ लाख ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर गेला आहे.६३६ कोटींच्या मदतीची गरजजिल्ह्यातील शेतपीकांच्या नुकसानीसाठी सुमारे ६३६ कोटी २३ लाख ३३ रुपयांच्या मदतीची गरज असून तसा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. जिरायतीसाठी २७८ कोटी ३० लाख, बागायत पिकांसाठी २११ कोटी ७ हजार तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १४६ कोटी २८ लाख असे एकूण जवळपास ६३६ कोटी २३ लाख ३३ रुपयांच्या मदतीची अपेक्षा आहे.क्षेत्रानुसार नुकसानीचा अंदाजजिरायत क्षेत्र : ४ लाक ९ हजार २७५ हेक्टर (१९५८ गावांमधील ५ लाख५३ हजार ४८४ शेतकरी बाधीत)बागायती क्षेत्र : १ लाख ५६ हजार ३५० हेक्टर (१ हजार ३६१ गावांमध्ये झाले असून, तेथील २ लाख ३० हजार ७७ शेतकरी बाधीत.बहुवार्षिक फळपिके : ८१ हजार २७० हेक्टर (१२१५ गावे व १ लाख ४ हजार ३६५ शेतकरी बाधीत)तालुकानिहाय नुकसानाची आकडेवारी (हेक्टरमध्ये)नाशिक : १२ हजार ७३२इगतपुरी : १४ हजार ९८त्र्यंबकेश्वर : ०८ हजार ५२दिंडोरी : २४ हजार ५७१पेठ : १३ हजार ६८३कळवण : २९ हजार २५३सुरगाणा : २२ हजार ८११बागलाण : ७४ हजार २४८चांदवड : ५७ हजार ७७२देवळा : ३९ हजार १५८मालेगाव : १ लाख १४ हजार ९४३येवला : ५८ हजार ४१३नांदगाव : ५६ हजार ९४३निफाड : ६३ हजार ८०७सिन्नर : ५१ हजार ७३१

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस