शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगावकरांना मांजरपाड्याच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 16:31 IST

येवला तालुका : उत्तरपूर्व भागात पोहोचलेल्या पाण्याने समाधान

ठळक मुद्देयेत्या पावसाळ्यात सदर पाणी हे डोंगरगाव पर्यंत नेऊन पोहोचविण्याचा शब्द राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : बहुप्रतिक्षीत अशा मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत येऊन ठेपले आहे तर येत्या पावसाळ्यात डोंगरगावपर्यंत पाणी जाऊन पोहोचणार असल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. सतत दुष्काळाचा शाप असलेल्या तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पोहोचलेल्या मांजरपाडयाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.येवला व चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरलेला आहे. यावर्षी मांजरपाड्याचे पाणी बाळापूर पर्यंत येऊन पोहोचल्याने तालुुक्याच्या उत्तरभागातील शेतक-यांच्या आशा उंचावल्या आहेत. येत्या पावसाळ्यात सदर पाणी हे डोंगरगाव पर्यंत नेऊन पोहोचविण्याचा शब्द राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन भुजबळ मंत्रिपदी विराजमान झाल्याने तालुक्यातील शेतक-यांच्या या प्रकल्पाबाबत आशा उंचावल्या आहेत. येवला तालुक्यातील कातरणी,विसापूर, विखरणी, आडगाव रेपाळ, मुरमी ,गुजरखेडे, बाळापूर, साबरवाडी खैरगव्हान तसेच चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहीसह परीसरातील गावामध्ये ार्जन्यमान सरासरी पेक्षा कमी झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला तर पेरणीयोग्य पाऊसही झालेला नव्हता त्यामुळे शेतकरीवर्गाचा जीव टांगणीला लागेलला असतानाच मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळाले. कालव्याला पाणी प्रवाहित झाल्याने परीसरातील जमिनीची भूक भागल्याने विहिरींना पाणी उतरले. या पाण्याच्या भरवशावर शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा, मका, कपाशी, मेथी यासह इतर नगदी पिकाचे नियोजन केले.शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाला होता मात्रया वर्षी विहिरींना पाणी चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. बेभरवशाचे असलेले कांदापीक या वर्षी मात्र शेतक-यांना लखपती करून गेले. कधी नव्हे तो कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याचीही लागवड सुरू असून उन्हाळ कांद्यालाही असाच भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकºयांसोबतच मजूर वर्गही खुश असून मजुरीचे दरही वाढल्याने मजुरांच्या हातात चार पैसे जास्तीचे येऊ लागले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी