शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

डोंगरगावकरांना मांजरपाड्याच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 16:31 IST

येवला तालुका : उत्तरपूर्व भागात पोहोचलेल्या पाण्याने समाधान

ठळक मुद्देयेत्या पावसाळ्यात सदर पाणी हे डोंगरगाव पर्यंत नेऊन पोहोचविण्याचा शब्द राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : बहुप्रतिक्षीत अशा मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत येऊन ठेपले आहे तर येत्या पावसाळ्यात डोंगरगावपर्यंत पाणी जाऊन पोहोचणार असल्याने शेतकरी चातकाप्रमाणे पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. सतत दुष्काळाचा शाप असलेल्या तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात पोहोचलेल्या मांजरपाडयाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.येवला व चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरलेला आहे. यावर्षी मांजरपाड्याचे पाणी बाळापूर पर्यंत येऊन पोहोचल्याने तालुुक्याच्या उत्तरभागातील शेतक-यांच्या आशा उंचावल्या आहेत. येत्या पावसाळ्यात सदर पाणी हे डोंगरगाव पर्यंत नेऊन पोहोचविण्याचा शब्द राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन भुजबळ मंत्रिपदी विराजमान झाल्याने तालुक्यातील शेतक-यांच्या या प्रकल्पाबाबत आशा उंचावल्या आहेत. येवला तालुक्यातील कातरणी,विसापूर, विखरणी, आडगाव रेपाळ, मुरमी ,गुजरखेडे, बाळापूर, साबरवाडी खैरगव्हान तसेच चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहीसह परीसरातील गावामध्ये ार्जन्यमान सरासरी पेक्षा कमी झाले आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला तर पेरणीयोग्य पाऊसही झालेला नव्हता त्यामुळे शेतकरीवर्गाचा जीव टांगणीला लागेलला असतानाच मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने उभ्या असलेल्या पिकांना जीवदान मिळाले. कालव्याला पाणी प्रवाहित झाल्याने परीसरातील जमिनीची भूक भागल्याने विहिरींना पाणी उतरले. या पाण्याच्या भरवशावर शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा, मका, कपाशी, मेथी यासह इतर नगदी पिकाचे नियोजन केले.शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघाला होता मात्रया वर्षी विहिरींना पाणी चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. बेभरवशाचे असलेले कांदापीक या वर्षी मात्र शेतक-यांना लखपती करून गेले. कधी नव्हे तो कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतक-यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याशिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणावर उन्हाळ कांद्याचीही लागवड सुरू असून उन्हाळ कांद्यालाही असाच भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकºयांसोबतच मजूर वर्गही खुश असून मजुरीचे दरही वाढल्याने मजुरांच्या हातात चार पैसे जास्तीचे येऊ लागले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी