शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वडाळागावातील गोठे डिसेंबरअखेर हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:11 IST

वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.  वडाळागावातील जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र उघड्यावर व रस्त्यावर सोडण्यात आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे गावात माणसे राहतात की जनावरे असा प्रश्न नागरिक करीत होते. त्याची दखल घेत अखेर प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सदरचे गोठे हलविण्यासाठी गोठे मालकांना डिसेंबरपर्यंत डेडलाईन दिली आहे.  वडाळागावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी संपूर्ण शेती होती. शेती व हातावर काम करणारी वस्ती म्हणून वडाळागावाची ओळख होती. त्यानंतर मात्र जमिनीला भाव मिळू लागल्याने शेती विकून याठिकाणी वसाहत निर्माण झाली. सुमारे २० वर्षांपूर्वी गावात एक ते दोन जनावरांचे गोठे होते. परंतु आज त्यांची संख्या सुमारे पंचवीस ते तीसच्या घरात गेली आहे. प्रत्येक जनावरांच्या गोठ्यात सुमारे सहाशे ते सातशे जनावरे आहेत. या सर्व गोठ्यांच्या मलमूत्राचा प्रश्न निर्माण होत असल्याने सर्वच गोठेधारकांकडून गोठ्याच्या बाहेर खड्ड्यात किंवा नाल्यात मलमूत्र सोडून दिले जात आहे. तसेच काही गोठेधारकांनी खत म्हणून मलमूत्र विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले आहे.दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यातरस्त्यावर मलमूत्राची घाण व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना नेहमीच साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता नूतन वर्षाच्या आत गावातील जनावरांचे गोठे हटवण्यात येणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcowगायNashikनाशिक