शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

राजकीय पक्ष कार्यालयात पोहोचणार मतदार याद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:25 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्याने तयारीत आघाडी घेतली असून, मतदानप्रक्रियेसाठी लागणारे कागद आणि मशीन्सच्या बॅटऱ्या बॅँगलोर येथून दाखल झाल्या आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये मतदारयाद्या पोहचविण्याचे कामदेखील सुरू झाले आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्याने तयारीत आघाडी घेतली असून, मतदानप्रक्रियेसाठी लागणारे कागद आणि मशीन्सच्या बॅटऱ्या बॅँगलोर येथून दाखल झाल्या आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राजकीय पक्ष कार्यालयांमध्ये मतदारयाद्या पोहचविण्याचे कामदेखील सुरू झाले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून करण्यात आलेल्या नियोजनाच्या माध्यमातून निवडणुकीच्या कामाला चांगलीच गती आली आहे. मतदारयाद्यांच्या शुद्धीकरणासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले असून, सर्वसामान्य नागरिक मतदानाच्या कामात गुंतल्याचे दिसते. विद्यार्थ्यांचादेखील सहभाग वाढल्यामुळे एकूणच जिल्ह्यातील निवडणूक तयारीच्या कामाला कमालीचा वेग आल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वीच जिल्हा निवडणूक शाखेने राज्य निवडणूक आयोगाकडे संभाव्य यंत्रांची मागणी नोंदविली असून त्यानुसार बॅँगलोर येथून काही साहित्य दाखलदेखील झाले असून, लवकरच अन्य मशीन्स आणि साहित्यदेखील दाखल होणार आहे.निवडणूक शाखेने आयोगाकडे यापूर्वीच दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट व सहा हजार कंट्रोल युनिटची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघात सुमारे ४४ लाख इतकी मतदारांची संख्या असून, निवडणूक प्रकिया सुरळित पार पाडण्यासाठी निवडणूक शाखेने विशेष खबरदारी घेतली आहे. येत्या १५ सप्टेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने निवडणूक शाखेकडून निवडणूक प्रक्रि या सुरळित पार पाडण्यासाठी तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर १९ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात मतदारयादी शुद्धीकरण आणि दुरुस्तीच्या कामाला गती देण्यात आलेली आहे.पुणे येथून बीईएलचे २८० बीयू युनिट नाशिकसाठी प्राप्त होणार आहेत, तर बॅँगलोरवरून २५९० कंट्रोल युनिट आणि २७८० व्हीव्हीपॅट मशीन्स उपलब्ध होणार आहे. असे असले तरी मतदान यंत्राच्या बॅटºया आणि पेपर्स आदी साहित्य बॅँगलोरवरून दाखल होणार आहे. साधारणत: आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही यंत्रे निवडणूक शाखेला प्राप्त होतील. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उपयोगात आणलेली ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन विधानसभा निवडणुकीसाठी वापरली जाणार नसल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.राजकीय पक्षांना याद्या रवानाजिल्हा निवडणूक शाखेने परिपूर्ण केलेल्या प्रारूप मतदारयाद्या राजकीय पक्षांच्या कार्यालयापर्यंत पोहचविण्याची मोहीम राबविली. शहरातील राजकीय पक्षांच्या कार्यालयात प्रत्यक्षात जाऊन निवडणुकीशी संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यलयांमध्ये मतदारयाद्यांचे पॅकिंग रवाना केले.मतदारांची संख्या व पंधरा मतदारसंघांतील मतदान केंद्रे यांची संख्या लक्षात घेता २२ हजार निवडणूक यंत्राची आवश्यकता आहे. त्यामध्ये दहा हजार बॅलेट युनिट, सहा हजार व्हीव्हीपॅट मशीन व सहा हजार कंट्रोल युनिट यंत्राची आवश्यकता आहे. ही मागणी निवडणूक शाखेने आयोगाकडे केली आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय