शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी पुनरिक्षण कामकाजाचे पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 01:40 IST

मागील महिन्यात निवडणूक शाखेने मतदार यादीचे शुद्धीकरण झाल्याचा दावा करीत ५४ हजार दुबार नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे आणि ४१ हजार नवमतदार यादीत समाविष्ट करण्याचा दावा केला होता. मात्र, शिवसेनेने मतदार यादीमध्ये तब्बल दोन लाख नावे अधिक असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने आजवर राबविलेल्या मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदणका: सातत्याने मोहीम राबवूनही दुबार नावे लाखभर

नाशिक: मागील महिन्यात निवडणूक शाखेने मतदार यादीचे शुद्धीकरण झाल्याचा दावा करीत ५४ हजार दुबार नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे आणि ४१ हजार नवमतदार यादीत समाविष्ट करण्याचा दावा केला होता. मात्र, शिवसेनेने मतदार यादीमध्ये तब्बल दोन लाख नावे अधिक असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने आजवर राबविलेल्या मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षण मोहीम सातत्याने राबविली जाते. अगदी कोरोनाच्या काळातही मोहीम राबविण्यात आल्याचा दावा करीत यादी शुद्ध झाल्याचा दावा प्रशासनाकडून वारंवार केला जात होता. मतदार यादी शुद्धीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून मतदार यादीतील मतदारांची दुबार नावे रद्द करणे, त्यांचा शाेध घेण्याचा प्रयत्न करणे, मतदारांच्या नाव-पत्त्याची खात्री करून त्यामध्ये बदल असेल तर तो करणे असा उपक्रम राबविला जातो. बीएलओच्या माध्यमातून मतदारांच्या दारापर्यंत प्रतिनिधी पोहोचून मतदाराबाबतची माहिती जाणून घेतली जाते. जेणेकरून मयत झालेल्यांची नावे वगळली जावी किंवा बदलून गेलेल्यांची नावे दोन्ही ठिकाणी राहू नये, याबाबतची दक्षता घेतली जाते.

परंतु, सर्व प्रक्रिया राबवूनही जिल्ह्यात अशाप्रकारे लाखोंच्या संख्येने मतदारांची नावे आल्याने जिल्हा प्रशासनाकडून याबाबतची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरातील मतदार संघाच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्याची गंभीर बाब शिवसेनेने पुराव्यासह समोर आणली आहे. त्यामुळे मोहिमेच्या सत्यतेबाबतचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. बीएलओ यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांची आणि ते राहत असलेल्या ठिकाणांची शहानिशा केल्याचे सांगितले जाते. असे असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात दुबार नावे कशी घुसविण्यात आली, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे.

मतदार यादी पुनर्पडताळणी मोहीम ही अविरत चालणारी प्रक्रिया असल्याने यात सुधारणा करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे राहणार आहे. असे असले तरी यासाठी यंत्रणेला पुन्हा पहिल्यापासून आणि जादा मनुष्यबळ वापरून यादी अधिक जागरुकतेने पूर्ण करावी लागणार आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्ध असणे अपेक्षित असताना शहरातील यादीमध्येच ग्रामीण भागातील नावे समाविष्ट झाल्यामुळे यंत्रणेच्या कामकाजातील मोठा दोषही यानिमित्ताने समोर आला आहे. आता जिल्हा प्रशासन याबाबत कोणती कार्यवाही करणार, याबाबत राजकीय पक्षांचे देखील लक्ष आहे.

टॅग्स :NashikनाशिकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग