शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

मतदार यादी पुनरिक्षण कामकाजाचे पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 01:40 IST

मागील महिन्यात निवडणूक शाखेने मतदार यादीचे शुद्धीकरण झाल्याचा दावा करीत ५४ हजार दुबार नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे आणि ४१ हजार नवमतदार यादीत समाविष्ट करण्याचा दावा केला होता. मात्र, शिवसेनेने मतदार यादीमध्ये तब्बल दोन लाख नावे अधिक असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने आजवर राबविलेल्या मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदणका: सातत्याने मोहीम राबवूनही दुबार नावे लाखभर

नाशिक: मागील महिन्यात निवडणूक शाखेने मतदार यादीचे शुद्धीकरण झाल्याचा दावा करीत ५४ हजार दुबार नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे आणि ४१ हजार नवमतदार यादीत समाविष्ट करण्याचा दावा केला होता. मात्र, शिवसेनेने मतदार यादीमध्ये तब्बल दोन लाख नावे अधिक असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने आजवर राबविलेल्या मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षण मोहीम सातत्याने राबविली जाते. अगदी कोरोनाच्या काळातही मोहीम राबविण्यात आल्याचा दावा करीत यादी शुद्ध झाल्याचा दावा प्रशासनाकडून वारंवार केला जात होता. मतदार यादी शुद्धीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून मतदार यादीतील मतदारांची दुबार नावे रद्द करणे, त्यांचा शाेध घेण्याचा प्रयत्न करणे, मतदारांच्या नाव-पत्त्याची खात्री करून त्यामध्ये बदल असेल तर तो करणे असा उपक्रम राबविला जातो. बीएलओच्या माध्यमातून मतदारांच्या दारापर्यंत प्रतिनिधी पोहोचून मतदाराबाबतची माहिती जाणून घेतली जाते. जेणेकरून मयत झालेल्यांची नावे वगळली जावी किंवा बदलून गेलेल्यांची नावे दोन्ही ठिकाणी राहू नये, याबाबतची दक्षता घेतली जाते.

परंतु, सर्व प्रक्रिया राबवूनही जिल्ह्यात अशाप्रकारे लाखोंच्या संख्येने मतदारांची नावे आल्याने जिल्हा प्रशासनाकडून याबाबतची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील मतदारांची नावे शहरातील मतदार संघाच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्याची गंभीर बाब शिवसेनेने पुराव्यासह समोर आणली आहे. त्यामुळे मोहिमेच्या सत्यतेबाबतचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. बीएलओ यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांची आणि ते राहत असलेल्या ठिकाणांची शहानिशा केल्याचे सांगितले जाते. असे असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात दुबार नावे कशी घुसविण्यात आली, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित होत आहे.

मतदार यादी पुनर्पडताळणी मोहीम ही अविरत चालणारी प्रक्रिया असल्याने यात सुधारणा करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे राहणार आहे. असे असले तरी यासाठी यंत्रणेला पुन्हा पहिल्यापासून आणि जादा मनुष्यबळ वापरून यादी अधिक जागरुकतेने पूर्ण करावी लागणार आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्ध असणे अपेक्षित असताना शहरातील यादीमध्येच ग्रामीण भागातील नावे समाविष्ट झाल्यामुळे यंत्रणेच्या कामकाजातील मोठा दोषही यानिमित्ताने समोर आला आहे. आता जिल्हा प्रशासन याबाबत कोणती कार्यवाही करणार, याबाबत राजकीय पक्षांचे देखील लक्ष आहे.

टॅग्स :NashikनाशिकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग