शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:36 IST

विधानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे.

वेळ : सायंकाळी ६.०० वाजता स्थळ : ज्येष्ठ नागरिक कट्टानाशिक : विधानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे. उमेदवारांसाठी हक्काचे मत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनामध्येही विभानसभेच्या निवडणुकांविषयी कुतूहल बघायला मिळत आहे. त्यामुळे मखलमलाबाद येथील ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावरही निवडणुकांविषयी सुरू असलेल्या चर्चेत त्यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून नवनवीन पायंडे वापरण्यात येतात, असे मत एका ज्येष्ठांनी व्यक्त केले. त्यावर एकाने लोकप्रतिनिधी फक्त निवडणूक आली की येऊन पाया पडतात व मत मागतात, मात्र परत पाच वर्षे तोंड दाखवत नसल्याचे सांगितले. तसेच एकाने माझा या ईव्हीएम मशीनवर विश्वासच नसून मतदानाच्या वेळी मशीनवर नुसते बटण दाबतो मात्र ते मत कोणाला जाते हे कळत नाही त्यामुळे बॅलेट पेपरवरच मतदान व्हायला पाहिजे, असे सांगितले. त्यात एकाने उमेदवारांच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गुंडप्रवृत्तीच्या लोकांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी न देण्याचे मत मांडले. अशात एका १०० वर्ष वयाच्या ज्येष्ठाने सरकार कुणाचे येवो मात्र सर्वसामान्यांना कुठलाही फायदा होत नाही तसेच उमेदवारपण त्यांचे पोट भरण्यातच समाधान मानतात. यावर सर्वांनी याला दुजोरा देत हे अगदी बरोबर असल्याचे सांगितले. यावेळी जवळपास सर्वच ज्येष्ठांनी मतदानप्रकियेत बदल करून बॅलेट पेपरवरच मतदान घ्यायला हवे, असे मत मांडले.(या चर्चेत रामचंद्र पिंगळे, नारायण काकड, दत्तात्रय काकड, प्रताप काकड, नितीन काकड, संतोष काकड, दिनकर काकड, निवृत्ती पिंगळे आदींनी सहभाग घेतला.)लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारने बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. मात्र विरोधी पक्षांसह अनेक नागरिकांनीही याबद्दल संशय व्यक्त केला. यामुळे या ज्येष्ठ नागरिकांनीही ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करत पुन्हा पूर्वीसारखे मतदान व्हायला हवे, असे मत मांडले. तसेच पूर्वी निवडणुकांसाठी एवढा पैसा खर्च केला जात नव्हता.मात्र आताचे राजकारणी पैशांच्या जोरावरच निवडून येत असून, त्यामुळे त्यांना सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाणीव उरत नाही, अशा भावनादेखील व्यक्त करण्यात आल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019EVM Machineएव्हीएम मशीन