शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:17 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

ठळक मुद्देवटकपाडा : काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.वटकपाडा (ता.त्र्यंबकेश्वर) येथे मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम सुरू आहे. खोदलेल्या मुख्य बांधावर सध्या माती टाकण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले आहे. गेल्या रविवारी (दि.१४) येथील ग्रामस्थांनी साठवण तलावाच्या कामाची पाहणी केली असता मुख्य बांधाच्या भरावात काळी मातीऐवजी मुरूम मातीचा थर देण्यात येत असल्याची बाब काही जाणकार ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त होत त्यांनी सदर काम बंद पाडले. ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने कोट्यवधी रुपयांच्या कामाला घरघर लागली आहे.साठवण तलावाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना उकृष्ट कामाच्याबाबत सूचना केल्या होत्या, मात्र त्या सूचनांचे अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून पालन न होता केराची टोपली दाखविण्यात आली आहे.वटकपाडा येथे कोट्यवधी रुपयांचे साठवण तलावाचे काम सुरू असून, केवळ ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे संबंधित काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. यामुळे साठवण तलावाच्या मुख्य बांधातून मुरूममातीच्या थरातून पाणी झिरपेल हे सांगता येत नाही. ग्रामस्थांनी हे काम तूर्तास बंद केले आहे.- गोपाळ गभाले, ग्रामस्थ, वटकपाडासाठवण तलावाच्या माध्यमातून १२० हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे सदरचे काम योग्यरीत्या ठेकेदारांकडून करून घेणार आहोत. ठेकेदाराचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दोन दिवसांपूर्वीच याबाबत ठेकेदारास सूचित करण्यात आले आहे. मुख्य बांधात माती परीक्षणानुसार पुरेपूर काळ्या मातीचा भर देण्यात येईल.- राजेंद्र धूम, उपकार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारणवर्षानुवर्षे येथील ग्रामस्थांचा रोजंदारीसाठी संघर्ष सुरू आहे. यामुळे येथील ग्रामस्थांसाठी पाणी महत्वाचा घटक आहे. या साठवण तलावाच्या माध्यमातून शेती, पाणीटंचाईवर मात होणार आहे. निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही. तसेच पुढील कामातही कमकुवतपणा वाटल्यास ठेकेदारांवर कारवाई करण्यास भाग पाडणार आहे.- हिरामण खोसकर, आमदार.

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासwater shortageपाणीकपात