शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
2
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
3
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
4
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
5
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
6
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
7
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
8
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
9
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
10
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
11
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
12
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
13
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
14
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
15
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
16
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
17
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
18
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
19
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
20
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:17 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

ठळक मुद्देवटकपाडा : काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.वटकपाडा (ता.त्र्यंबकेश्वर) येथे मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम सुरू आहे. खोदलेल्या मुख्य बांधावर सध्या माती टाकण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले आहे. गेल्या रविवारी (दि.१४) येथील ग्रामस्थांनी साठवण तलावाच्या कामाची पाहणी केली असता मुख्य बांधाच्या भरावात काळी मातीऐवजी मुरूम मातीचा थर देण्यात येत असल्याची बाब काही जाणकार ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त होत त्यांनी सदर काम बंद पाडले. ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने कोट्यवधी रुपयांच्या कामाला घरघर लागली आहे.साठवण तलावाच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना उकृष्ट कामाच्याबाबत सूचना केल्या होत्या, मात्र त्या सूचनांचे अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून पालन न होता केराची टोपली दाखविण्यात आली आहे.वटकपाडा येथे कोट्यवधी रुपयांचे साठवण तलावाचे काम सुरू असून, केवळ ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे संबंधित काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. यामुळे साठवण तलावाच्या मुख्य बांधातून मुरूममातीच्या थरातून पाणी झिरपेल हे सांगता येत नाही. ग्रामस्थांनी हे काम तूर्तास बंद केले आहे.- गोपाळ गभाले, ग्रामस्थ, वटकपाडासाठवण तलावाच्या माध्यमातून १२० हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे सदरचे काम योग्यरीत्या ठेकेदारांकडून करून घेणार आहोत. ठेकेदाराचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. दोन दिवसांपूर्वीच याबाबत ठेकेदारास सूचित करण्यात आले आहे. मुख्य बांधात माती परीक्षणानुसार पुरेपूर काळ्या मातीचा भर देण्यात येईल.- राजेंद्र धूम, उपकार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारणवर्षानुवर्षे येथील ग्रामस्थांचा रोजंदारीसाठी संघर्ष सुरू आहे. यामुळे येथील ग्रामस्थांसाठी पाणी महत्वाचा घटक आहे. या साठवण तलावाच्या माध्यमातून शेती, पाणीटंचाईवर मात होणार आहे. निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही. तसेच पुढील कामातही कमकुवतपणा वाटल्यास ठेकेदारांवर कारवाई करण्यास भाग पाडणार आहे.- हिरामण खोसकर, आमदार.

 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासwater shortageपाणीकपात