शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पाणी न मिळाल्यास पुढाऱ्यांना गावबंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:46 IST

माळवाडी : नाशिक जिल्ह्यात पूर्ण पावसाळ्यात देवळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले, पाझर तलाव अजूनही कोरडे पडले आहेत. हे लक्षात घेऊन तातडीने माळवाडीसह लोहणेर शिवारातील तानाजी पाझर तलाव चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमाळवाडी : तानाजी पाझर तलाव पाण्याने भरून देण्याची मागणी

माळवाडी : नाशिक जिल्ह्यात पूर्ण पावसाळ्यात देवळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले, पाझर तलाव अजूनही कोरडे पडले आहेत. हे लक्षात घेऊन तातडीने माळवाडीसह लोहणेर शिवारातील तानाजी पाझर तलाव चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.गत व चालुवर्षी देवळा तालुक्याच्या अनेक भागात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे अजूनही दुष्काळी परिस्तिती कायम आहे. यामुळे चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर धरण भरण्यात आले असून, रामेश्वर धरणातून पूर्व भागासाठी वाढीव कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. मात्र चणकापूर उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील माळवाडी, फुलेमाळवाडी सरस्वतीवाडी, तानाजी पाझर तलाव येथील शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत.या कालव्याचे पाणी खाटकी नाल्याद्वारे माळवाडी येथील पाझर तलाव व तानाजी पाझर तलाव भरण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकरी बांधव करीत आहेत. पण अद्याप या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. यामुळे आता परिसरातील शेतकºयांनी पाणी न मिळाल्यास तहसीलदारांना निवेदन देऊन पुढाºयांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे.अत्यल्प पावसामुळे विहिरींना अजूनही पाणी आलेले नाही. पावसाळा संपत आला आहे, त्यात आता विहिरींना पाणी नाही म्हणून पुढील हंगामात शेती करणं अवघड होईल की काय? अशी चिंता आता शेतकºयांना भेडसावू लागली आहे.निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, सरपंच शिवाजी बागुल, सरपंच उषा शेवाळे, सुशांत गुंजाळ, संतोष बागुल, सतीश बागुल, विकी बच्छाव, बापू बागुल, डॉ संदीप बागुल, हेमंत बागुल, वैभव बागुल, किरण बच्छाव, भगवान बागुल, महेंद्र सोनवणे, जितेंद्र बागुल, लंकेश बागुल, बाळासाहेब बच्छाव आदीच्या स्वाक्षरी आहेत.गेल्या दीड महिन्यांपासून इतरत्र उजव्या कालव्याचे पाणी दिले जात आहे. तसेच पाणी माळवाडीसह तानाजी पाझर तलावात द्यावे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून आम्ही आता २१ सप्टेंबर पासून उपोषण व गाव बंदीची हाक देत आहोत.- रमेश अहिरे, अध्यक्ष, समता परिषद, लोहणेर.तूर्तास पाऊस जरी पडतो आहे, पण त्या पावसाने विहिरींना पाणी आलले नाही म्हणून पुढील हंगाम पाण्यावाचून शेती करणं अवघड आहे, त्यासाठी आज खाटकी नाल्यात पाणी सोडण्यात यावे.- सतीश बागुल, माळवाडी.