शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

पाणी न मिळाल्यास पुढाऱ्यांना गावबंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:46 IST

माळवाडी : नाशिक जिल्ह्यात पूर्ण पावसाळ्यात देवळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले, पाझर तलाव अजूनही कोरडे पडले आहेत. हे लक्षात घेऊन तातडीने माळवाडीसह लोहणेर शिवारातील तानाजी पाझर तलाव चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमाळवाडी : तानाजी पाझर तलाव पाण्याने भरून देण्याची मागणी

माळवाडी : नाशिक जिल्ह्यात पूर्ण पावसाळ्यात देवळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले, पाझर तलाव अजूनही कोरडे पडले आहेत. हे लक्षात घेऊन तातडीने माळवाडीसह लोहणेर शिवारातील तानाजी पाझर तलाव चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.गत व चालुवर्षी देवळा तालुक्याच्या अनेक भागात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे अजूनही दुष्काळी परिस्तिती कायम आहे. यामुळे चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर धरण भरण्यात आले असून, रामेश्वर धरणातून पूर्व भागासाठी वाढीव कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. मात्र चणकापूर उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील माळवाडी, फुलेमाळवाडी सरस्वतीवाडी, तानाजी पाझर तलाव येथील शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत.या कालव्याचे पाणी खाटकी नाल्याद्वारे माळवाडी येथील पाझर तलाव व तानाजी पाझर तलाव भरण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकरी बांधव करीत आहेत. पण अद्याप या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. यामुळे आता परिसरातील शेतकºयांनी पाणी न मिळाल्यास तहसीलदारांना निवेदन देऊन पुढाºयांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे.अत्यल्प पावसामुळे विहिरींना अजूनही पाणी आलेले नाही. पावसाळा संपत आला आहे, त्यात आता विहिरींना पाणी नाही म्हणून पुढील हंगामात शेती करणं अवघड होईल की काय? अशी चिंता आता शेतकºयांना भेडसावू लागली आहे.निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, सरपंच शिवाजी बागुल, सरपंच उषा शेवाळे, सुशांत गुंजाळ, संतोष बागुल, सतीश बागुल, विकी बच्छाव, बापू बागुल, डॉ संदीप बागुल, हेमंत बागुल, वैभव बागुल, किरण बच्छाव, भगवान बागुल, महेंद्र सोनवणे, जितेंद्र बागुल, लंकेश बागुल, बाळासाहेब बच्छाव आदीच्या स्वाक्षरी आहेत.गेल्या दीड महिन्यांपासून इतरत्र उजव्या कालव्याचे पाणी दिले जात आहे. तसेच पाणी माळवाडीसह तानाजी पाझर तलावात द्यावे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून आम्ही आता २१ सप्टेंबर पासून उपोषण व गाव बंदीची हाक देत आहोत.- रमेश अहिरे, अध्यक्ष, समता परिषद, लोहणेर.तूर्तास पाऊस जरी पडतो आहे, पण त्या पावसाने विहिरींना पाणी आलले नाही म्हणून पुढील हंगाम पाण्यावाचून शेती करणं अवघड आहे, त्यासाठी आज खाटकी नाल्यात पाणी सोडण्यात यावे.- सतीश बागुल, माळवाडी.