शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

पाणी न मिळाल्यास पुढाऱ्यांना गावबंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:46 IST

माळवाडी : नाशिक जिल्ह्यात पूर्ण पावसाळ्यात देवळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले, पाझर तलाव अजूनही कोरडे पडले आहेत. हे लक्षात घेऊन तातडीने माळवाडीसह लोहणेर शिवारातील तानाजी पाझर तलाव चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमाळवाडी : तानाजी पाझर तलाव पाण्याने भरून देण्याची मागणी

माळवाडी : नाशिक जिल्ह्यात पूर्ण पावसाळ्यात देवळा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील नदी, नाले, पाझर तलाव अजूनही कोरडे पडले आहेत. हे लक्षात घेऊन तातडीने माळवाडीसह लोहणेर शिवारातील तानाजी पाझर तलाव चणकापूर उजव्या कालव्याच्या पाण्याने भरून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.गत व चालुवर्षी देवळा तालुक्याच्या अनेक भागात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे अजूनही दुष्काळी परिस्तिती कायम आहे. यामुळे चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर धरण भरण्यात आले असून, रामेश्वर धरणातून पूर्व भागासाठी वाढीव कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. मात्र चणकापूर उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील माळवाडी, फुलेमाळवाडी सरस्वतीवाडी, तानाजी पाझर तलाव येथील शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत.या कालव्याचे पाणी खाटकी नाल्याद्वारे माळवाडी येथील पाझर तलाव व तानाजी पाझर तलाव भरण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकरी बांधव करीत आहेत. पण अद्याप या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. यामुळे आता परिसरातील शेतकºयांनी पाणी न मिळाल्यास तहसीलदारांना निवेदन देऊन पुढाºयांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे.अत्यल्प पावसामुळे विहिरींना अजूनही पाणी आलेले नाही. पावसाळा संपत आला आहे, त्यात आता विहिरींना पाणी नाही म्हणून पुढील हंगामात शेती करणं अवघड होईल की काय? अशी चिंता आता शेतकºयांना भेडसावू लागली आहे.निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, सरपंच शिवाजी बागुल, सरपंच उषा शेवाळे, सुशांत गुंजाळ, संतोष बागुल, सतीश बागुल, विकी बच्छाव, बापू बागुल, डॉ संदीप बागुल, हेमंत बागुल, वैभव बागुल, किरण बच्छाव, भगवान बागुल, महेंद्र सोनवणे, जितेंद्र बागुल, लंकेश बागुल, बाळासाहेब बच्छाव आदीच्या स्वाक्षरी आहेत.गेल्या दीड महिन्यांपासून इतरत्र उजव्या कालव्याचे पाणी दिले जात आहे. तसेच पाणी माळवाडीसह तानाजी पाझर तलावात द्यावे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून आम्ही आता २१ सप्टेंबर पासून उपोषण व गाव बंदीची हाक देत आहोत.- रमेश अहिरे, अध्यक्ष, समता परिषद, लोहणेर.तूर्तास पाऊस जरी पडतो आहे, पण त्या पावसाने विहिरींना पाणी आलले नाही म्हणून पुढील हंगाम पाण्यावाचून शेती करणं अवघड आहे, त्यासाठी आज खाटकी नाल्यात पाणी सोडण्यात यावे.- सतीश बागुल, माळवाडी.