पंचवटी : परिसरातील मुख्य रस्त्यालगत वृक्षांच्या फांदांनी विजतारा गाठल्या असल्याने ऐन पावसाळयात या वृक्षांच्या फांदांमुळे शॉर्टसर्किट होण्याची दाट शक्यता असल्याने पावसाळा सुरू होण्यापुर्वी विजवितरण कंपनी तसेच महापालिका प्रशासनाने वृक्षांच्या वाढलेल्या फांदा छाटाव्यात अशी मागणी नागरीकांनी केली आहे. पावसाळयात दरवर्षी वादळी वारा सुटल्यानंतर वृक्षांच्या फांदा विज तारांवर आदळतात त्यामुळे कधी कधी विजतारा तुटून जमिनीवर लटकतात तर शॉर्टसर्किट होऊन विजप्रवाह खंडीत होत असतो. वृक्षाच्या वाढलेल्या फांदामुळे पावसाळयात दरवर्षी धोका निर्माण होत असतो. मान्सुन सुरू व्हायला आणखी महिन्याभराचा कालावधी असला तरी संबंधित विभागाने पावसाळयापुर्वीच वृक्षांच्या वाढलेल्या फांदा छाटल्या तर पावसाळयात उदभवणार्या अडचणी निर्माण होणार नाही व धोकाही टळेले त्यामुळे प्रशासनाने परिसरातील वाढलेल्या वृक्षांची पाहणी करून विजतारालगतच्या वृक्षाच्या फांदा छाटण्याचे काम हाती घ्यावे अशी मागणी नागरीकांनी केली आहे. (वार्ताहर)
वृक्षांच्या फांद्यांनी गाठल्या विजतारा
By admin | Updated: May 7, 2014 22:00 IST