शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

काळजीवाहू सरकारमुळे बळीराजा काळजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:31 IST

मदतीबाबत संभ्रम : सत्तासंघर्ष मिटण्याची अपेक्षा

ठळक मुद्देराज्यातील सत्तासंघर्ष तातडीने निवळावा आणि कोलमडून पडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुदर्शन सारडाओझर : नोव्हेंबर उजाडला तरी अवकाळी पाऊस पाठ सोडायला तयार नाही. त्यातून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन कोलमडलेल्या बळीराजाला उभारी देण्याची अपेक्षा सरकारकडून केली जात असतानाच राज्यातील सत्तासंघर्षात काळजीवाहू सरकारमुळे आता बळीराजाच काळजीत पडला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने शेतकऱ्यांना मिळणा-या तत्काळ मदतीविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.गेल्या महिनाभरापासून राज्यात कोसळणा-या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत केवळ प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आश्वासने नेत्यांनी दिली तर निकालानंतर जिल्ह्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने आता राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे सुरू आहेत. या पाहणी दौ-याप्रसंगी शेतक-यांची विचारपूस करताना त्यांना नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ मदतीचे आश्वासन दिले जात आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी सत्तासंघर्षात नवीन सरकार आरुढ होऊ शकलेले नाही. त्यातच सत्ता स्थापनेसाठी कुणीही राजकीय पक्ष पुढे न आल्याने राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहेत. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना मिळणा-या मदतीविषयी साशंकता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीने पंचनामे होऊन भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. त्यातच सरकारच स्थापन नसल्याने नोकरशाहीवर नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे पंचनाम्यांनाही विलंब लागतो आहे. त्याबाबत शेतक-यांना नाराजीचा सूर कायम आहे. सरकारच नसल्याने बळीराजाचा आवाज कोण ऐकणार अशी स्थिती निर्माण झाली असून काळजीवाहू सरकारमुळे बळीराजाच अधिक काळजीत पडला आहे. शेतक-यांना तातडीने मदत मिळाली नाही तर रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम संभवतो. राज्यातील सत्तासंघर्ष तातडीने निवळावा आणि कोलमडून पडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नुकसानीचा टक्का अधिकनोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पडलेला पाऊस अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते करून गेला तर नुकसानीचा टक्का देखील पूर्वीपेक्षा अधिक वाढला. सरकारची मुदत शिल्लक असताना त्यावेळी सरकारकडून बळीराजाला दिलासा देण्याची अपेक्षा असताना सरकार स्थापन करु पाहणारे सत्तेच्या गणिताचा पेपर सोडविण्यात मग्न होते. आता विधानसभेची मुदत संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून कोणती अपेक्षा करायची, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी