शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

काळजीवाहू सरकारमुळे बळीराजा काळजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:31 IST

मदतीबाबत संभ्रम : सत्तासंघर्ष मिटण्याची अपेक्षा

ठळक मुद्देराज्यातील सत्तासंघर्ष तातडीने निवळावा आणि कोलमडून पडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुदर्शन सारडाओझर : नोव्हेंबर उजाडला तरी अवकाळी पाऊस पाठ सोडायला तयार नाही. त्यातून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन कोलमडलेल्या बळीराजाला उभारी देण्याची अपेक्षा सरकारकडून केली जात असतानाच राज्यातील सत्तासंघर्षात काळजीवाहू सरकारमुळे आता बळीराजाच काळजीत पडला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने शेतकऱ्यांना मिळणा-या तत्काळ मदतीविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.गेल्या महिनाभरापासून राज्यात कोसळणा-या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत केवळ प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आश्वासने नेत्यांनी दिली तर निकालानंतर जिल्ह्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने आता राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे सुरू आहेत. या पाहणी दौ-याप्रसंगी शेतक-यांची विचारपूस करताना त्यांना नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ मदतीचे आश्वासन दिले जात आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी सत्तासंघर्षात नवीन सरकार आरुढ होऊ शकलेले नाही. त्यातच सत्ता स्थापनेसाठी कुणीही राजकीय पक्ष पुढे न आल्याने राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहेत. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना मिळणा-या मदतीविषयी साशंकता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीने पंचनामे होऊन भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. त्यातच सरकारच स्थापन नसल्याने नोकरशाहीवर नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे पंचनाम्यांनाही विलंब लागतो आहे. त्याबाबत शेतक-यांना नाराजीचा सूर कायम आहे. सरकारच नसल्याने बळीराजाचा आवाज कोण ऐकणार अशी स्थिती निर्माण झाली असून काळजीवाहू सरकारमुळे बळीराजाच अधिक काळजीत पडला आहे. शेतक-यांना तातडीने मदत मिळाली नाही तर रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम संभवतो. राज्यातील सत्तासंघर्ष तातडीने निवळावा आणि कोलमडून पडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नुकसानीचा टक्का अधिकनोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पडलेला पाऊस अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते करून गेला तर नुकसानीचा टक्का देखील पूर्वीपेक्षा अधिक वाढला. सरकारची मुदत शिल्लक असताना त्यावेळी सरकारकडून बळीराजाला दिलासा देण्याची अपेक्षा असताना सरकार स्थापन करु पाहणारे सत्तेच्या गणिताचा पेपर सोडविण्यात मग्न होते. आता विधानसभेची मुदत संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून कोणती अपेक्षा करायची, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी