शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

काळजीवाहू सरकारमुळे बळीराजा काळजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 17:31 IST

मदतीबाबत संभ्रम : सत्तासंघर्ष मिटण्याची अपेक्षा

ठळक मुद्देराज्यातील सत्तासंघर्ष तातडीने निवळावा आणि कोलमडून पडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुदर्शन सारडाओझर : नोव्हेंबर उजाडला तरी अवकाळी पाऊस पाठ सोडायला तयार नाही. त्यातून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन कोलमडलेल्या बळीराजाला उभारी देण्याची अपेक्षा सरकारकडून केली जात असतानाच राज्यातील सत्तासंघर्षात काळजीवाहू सरकारमुळे आता बळीराजाच काळजीत पडला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने शेतकऱ्यांना मिळणा-या तत्काळ मदतीविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.गेल्या महिनाभरापासून राज्यात कोसळणा-या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत केवळ प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आश्वासने नेत्यांनी दिली तर निकालानंतर जिल्ह्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने आता राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे सुरू आहेत. या पाहणी दौ-याप्रसंगी शेतक-यांची विचारपूस करताना त्यांना नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ मदतीचे आश्वासन दिले जात आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी सत्तासंघर्षात नवीन सरकार आरुढ होऊ शकलेले नाही. त्यातच सत्ता स्थापनेसाठी कुणीही राजकीय पक्ष पुढे न आल्याने राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहेत. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना मिळणा-या मदतीविषयी साशंकता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीने पंचनामे होऊन भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. त्यातच सरकारच स्थापन नसल्याने नोकरशाहीवर नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे पंचनाम्यांनाही विलंब लागतो आहे. त्याबाबत शेतक-यांना नाराजीचा सूर कायम आहे. सरकारच नसल्याने बळीराजाचा आवाज कोण ऐकणार अशी स्थिती निर्माण झाली असून काळजीवाहू सरकारमुळे बळीराजाच अधिक काळजीत पडला आहे. शेतक-यांना तातडीने मदत मिळाली नाही तर रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम संभवतो. राज्यातील सत्तासंघर्ष तातडीने निवळावा आणि कोलमडून पडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नुकसानीचा टक्का अधिकनोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पडलेला पाऊस अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते करून गेला तर नुकसानीचा टक्का देखील पूर्वीपेक्षा अधिक वाढला. सरकारची मुदत शिल्लक असताना त्यावेळी सरकारकडून बळीराजाला दिलासा देण्याची अपेक्षा असताना सरकार स्थापन करु पाहणारे सत्तेच्या गणिताचा पेपर सोडविण्यात मग्न होते. आता विधानसभेची मुदत संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून कोणती अपेक्षा करायची, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी