शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अनधिकृत स्पीड ब्रेकरने घेतला कामगाराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 15:18 IST

रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिरामागे राहणारे प्रेस कामगार सतीश दत्तात्रय बेलेकर (५७) हे गुरुवारी रात्री भगूर गावात खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून रात्री १०.३० ते ११ वाचेच्या दरम्यान आपली दुचाकी (एमएच १५ इएफ ४२१७)वरून घरी जात

भगूर : येथील मारवाडी गल्लीतील गतिरोधकावरून गुरुवारी रात्री पडून गंभीर जखमी झालेल्या प्रेस कामगाराचा रविवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या गतिरोधकाने एका नागरिकांचा बळी घेतल्याने जनमानसात संतापाची लाट उसळली आहे.रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिरामागे राहणारे प्रेस कामगार सतीश दत्तात्रय बेलेकर (५७) हे गुरुवारी रात्री भगूर गावात खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून रात्री १०.३० ते ११ वाचेच्या दरम्यान आपली दुचाकी (एमएच १५ इएफ ४२१७)वरून घरी जात असताना मारवाडी गल्लीतील सुराणा यांच्या घरासमोरील काँक्रीट रोडवर बेकायदेशीरपणे उभारलेल्या मोठ्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने सतीश बेलेकर यांचे वाहन आदळून खाली पडले. या अपघातात त्यांच्या मेंदूस मार बसल्याने ते रक्तस्राव होऊन गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी सतीश बेलेकर यांची प्राणज्योत मालवली. गृहरक्षक दलातही सेवा बजावणाऱ्या बेलेकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे. या अपघाती मृत्यूप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.दरम्यान, पालिकेने रस्ते काँक्रीटीकरण केल्यानंतर काही नागरिकांनी आपापल्या गरजेनुसार वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी उंचच उंच गतिरोधक जागोजागी उभारले. त्याबाबत सूचना देणारे फलक, तसेच गतिरोधकाला काळेपांढरे पट्टे नसल्याने रात्रीच्या अंधारात त्यांचा अंदाज नवोदित वाहनधारकांना येत नसल्याने तेथे वारंवार छोटे-मोठे अपघात होतात. आता हे गतिरोधक नागरिकांच्या जिवावर बेतू लागल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. पालिकेने याची दखल घेऊन गावातील असे बेकायदेशीर गतिरोधक तत्काळ हटवावे आणि गतिरोधक उभारणाºयावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक