शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

दिवाळीत शहरामध्ये अत्यंत कमी वायू प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:54 IST

केंद्र शासनाने प्रदूषणाचा धोका असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश केल्यानंतर शहराची हवा शुद्ध करण्यासाठी अभियान राबविण्याची तयारी सुरू असतानाच दिवाळीत मात्र फटक्यांचा जोर यंदा कमी असल्याने वायुप्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देप्रदूषण मंडळाची माहिती : फटक्यांच्या कडकडाटात घट

नाशिक : केंद्र शासनाने प्रदूषणाचा धोका असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश केल्यानंतर शहराची हवा शुद्ध करण्यासाठी अभियान राबविण्याची तयारी सुरू असतानाच दिवाळीत मात्र फटक्यांचा जोर यंदा कमी असल्याने वायुप्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरवर्षी दिवाळीदरम्यान राज्यातील हवेच्या गुणवत्तेची राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी केली जाते. त्यानुसार यंदाही करण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनेदेखील तपासणी करण्यात आली. या हवा गुणवत्तेची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार या वर्षाच्या दिवाळीत राज्यातील सर्वात वाईट हवेची गुणवत्ता उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कल्याणमध्ये नोंदवली गेली. मात्र, या आकडेवारीनुसार राज्याच्या बहुतांश भागात मागील वर्षाच्या तुलनेत वायुप्रदूषण कमी असल्याचे नोंदवण्यात आले.औरंगाबाद, चंद्रपूर, कल्याण, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे आणि नागपूर या सर्व दहा शहरांचे वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सणाच्या काळात चांगले, समाधानकारक आणि मध्यम पातळीवर मोजले गेले.त्यातही नाशिकचे प्रदूषण दिवाळीच्या काळात अत्यंत कमी होते. ५ नोव्हेंबर रोजी तर नाशिक शहराचे वातावरण देशभरात उत्कृष्ट म्हणून नोंदवले गेले आहे.एक्यूआय हे वातावरणातील प्रदूषकांच्या केंद्रीकरणाचे मोजमाप करणारे एकक आहे. वातावरणाच्या गुणवत्तेवर फटाके फोडण्यामुळे होणाºया परिणामाचे परीक्षण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीदरम्यान तीन दिवस वायुप्रदूषणाची पातळी मोजली गेली. एक्यूआय ३३ आणि ३१ हे दोन्हीही आकडे उत्तम एक्यूआय म्हणून ग्राह्य धरले जातात. 

टॅग्स :Nashikनाशिकpollutionप्रदूषणDiwaliदिवाळी