शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

प्रारुप मतदार याद्यांची तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:48 AM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीनुसार जिल्हा निवडणूक शाखेत मतदार याद्यांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेच्या वतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीनुसार जिल्हा निवडणूक शाखेत मतदार याद्यांच्या तपासणीचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची एकूण आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आता सदर याद्यांच्या तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे.लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मतदारयाद्या परिपूर्ण आणि दोषरहित करण्यासाठी जिल्हाभर व्यापक मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत सर्वसामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने नागरिकांना मतदार नोंदणीबाबत जागरूक करण्याची मोहीम महत्त्वाची ठरली. या मोहिमेमुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश आले आणि त्याचाच परिणाम म्हणून जवळपास ४० हजार मयत आणि दुबार मतदारांची नावे यादीतून वगळ्यात आली, तर सुमारे २८ हजार नवीन मतदारांच्या नावांची नोंदणी होऊ शकली. मतदार कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेमुळेदेखील सदर काम वेळेत पूर्ण होऊ शकल्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळाला आहे.जिल्हाधिकारी सूरज मांढरे आाणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी केलेल्या नियोजनानुसार १५ जुलै रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्याची तारीख निश्चित केलेली असल्यामुळे मतदार कर्मचाऱ्यांबरोबरच निवडणूक नायब तहसीलदार, निवडणूक लिपिक यांच्याबरोबरच निवडणूक विभागाच्या कर्मचाºयांनी दिलेल्या मुदतीत काम करून जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाºयांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रारूप मतदारयाद्या तयार झालेल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निवडणूक शाखेजवळ सध्या या मतदार याद्यांची तपासणी सुरू झाली असून, कर्मचारी कामाला लागले आहेत. याद्यांची बिनचूक छपाई, पाने तसेच मतदार याद्यांचा क्रम तसेच मतदारांची छायाचित्रे आदींची तपासणी करूनच त्यावर निवडणूक शाखेचे शिक्के मारले जात आहेत.ओळखपत्रांची प्रतीक्षानिवडणूक शाखेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी चालविली असली तरी मतदारांना मात्र ओळखपत्राची प्रतीक्षा आहे. पूर्वीच्या ओळखपत्रातील त्रुटी, फोटोंचा दर्जा सुमार असल्याने मतदारांना स्मार्ट ओळखपत्र या निवडणुकीत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र सदर संपूर्ण प्रक्रिया ही दिल्लीहून होत असल्यामुळे निवडणुकीपर्यंत ओळखपत्र मतदारांना मिळतील का असा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा