शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

व्हेंटिलेटरअभावी थांबला अर्भकाचा श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:53 IST

नाशिक : आॅगस्ट महिन्यात ५५ अर्भके दगावल्याने चर्चेत असलेल्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणखी एक अर्भक दगावले. हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्री जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र रुग्णालयाच्या शिशू दक्षता विभागात बाळांसाठी लागणाºया विशेष व्हेंटिलेटरची सुविधा नसल्यामुळे अर्भकाचा श्वास थांबल्याची घटना मंगळवारी (दि.२६) उघडकीस आली.पेठ ...

नाशिक : आॅगस्ट महिन्यात ५५ अर्भके दगावल्याने चर्चेत असलेल्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणखी एक अर्भक दगावले. हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्री जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र रुग्णालयाच्या शिशू दक्षता विभागात बाळांसाठी लागणाºया विशेष व्हेंटिलेटरची सुविधा नसल्यामुळे अर्भकाचा श्वास थांबल्याची घटना मंगळवारी (दि.२६) उघडकीस आली.पेठ तालुक्यातील एका  आदिवासी पाड्यावरील हेमलता  जगदीश कहांडोळे या महिलेला प्रसूतीवेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात सोमवारी रात्री दीड वाजता दाखल केले. रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात बाळ-मातेला हलविण्याचा सल्ला दिला. मध्यरात्री नवजात शिशुला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथील नवजात शिशु दक्षता विभागात बाळाला उपचारार्थ दाखल करून घेण्यात आले; मात्र बाळाची अपुरी वाढ होऊन ३२ आठवड्यांतच प्रसूती झाल्याने प्रकृती गंभीर होती, असे येथील डॉक्टरांनी सांगितले. रक्तस्त्राव बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र व्हेंटिलेटरशिवाय बाळाला वाचविणे शक्य नसल्याने कुटुंबीयांना आडगावच्या पवार वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिला. मात्र पवार वैद्यकीय महाविद्यालयातही व्हेंटिलेटर रिकामे नसल्याने त्यांनी पुन्हा बाळाला जिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी पुन्हा तपासून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. दरम्यान, तेथे जाताना रस्त्यातच या बालकाचा मृत्यू झाला.३२ आठवड्यांचे बाळ जन्माला आले. फुफ्फुसामध्येही रक्तस्त्राव होत होता. बाळावर शक्य तेवढे उपचार करून रक्तस्त्राव थांबविला. आॅक्सिजन देण्याचा प्रयत्न केला; मात्र व्हेंटिलेटरशिवाय बाळाला वाचविणे शक्य नव्हते आणि विभागात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यामुळे पवार रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला; मात्र काही वेळेतच क हांडोळे कुटुंबीय बाळाला घेऊन पुन्हा परतले.  - डॉ. दिनेश ठाकूर, नवजात शिशू अतिदक्षता विभागदौरे झाले, पण फलित काय?५५ अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना राज्यभर गाजल्यानंतर नगरसेवकांपासून ते राज्याच्या आरोग्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाची वारी केली. पाहणी केली, आश्वासनांची खैरात केली; मात्र फलित काय? असाच प्रश्न या घटनेमुळे पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा रुग्णालयाचा नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्याप ‘व्हेंटिलेटर’वर असल्याने बालके दगावत आहेत. येथील रुग्णालयात पुरेशा संख्येने वॉर्मरही नाही आणि मनुष्यबळही नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.४२ शिशू उपचारार्थ दाखलनाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ‘वॉर्मर’ची संख्या तोकडी असून, अत्यवस्थ अवस्थेत दाखल होणाºया अर्भकांचे प्रमाण अधिक आहे. १८ वॉर्मर असलेल्या शिशू अतिदक्षता विभागात सध्या ४२ बालके उपचारार्थ दाखल आहेत. वॉर्मरची संख्या कमी आणि बालके दगावण्याचा धोका अधिक असल्यामुळे एका वॉर्मरवर तीन ते चार शिशूंना ठेवून प्रशासनाला उपचार करावे लागत आहे.‘टर्शरी केअर सेंटर’ला  मान्यता कधी ?नाशिकचे जिल्हा शासकीय रुग्णालय श्रेणी दोनमध्ये समाविष्ट असल्यामुळे अडचण निर्माण होऊन शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या रुग्णालयाला ‘टर्शरी केअर सेंटर’ अद्याप उपलब्ध होऊ शकलेले नाही, परिणामी आॅक्सिजनची गरज भासणाºया नवजात शिशूंवर उपचारासाठी व्हेंटिलेटरसह ते हाताळणारे तज्ज्ञ डॉक्टरदेखील पुरविले गेलेले नाहीत. यामुळे अखेरच्या टप्प्यात धोक्याची पातळी ओलांडलेल्या गंभीर शिशूंचा आॅक्सिजनअभावी मृत्यू होत आहे. ही सरकारी त्रुटी कशी दूर होईल, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित  केला आहे.