शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:16 IST

महाराज्य राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या व्हीटीएसपीआयएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि पॅसेंजर इन्फरमेशन सिस्टीमचा पायलेट प्रोजेक्ट राबविण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला आहे. सध्या जिल्हाभरात रस्त्यांची माहिती घेण्याचे काम चालू असून, त्याचे नियोजन पूर्ण होताच जिल्ह्यातील सहा आगारांमध्ये ही यंत्रणा सुरू होणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली.

नाशिक : महाराज्य राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या व्हीटीएसपीआयएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि पॅसेंजर इन्फरमेशन सिस्टीमचा पायलेट प्रोजेक्ट राबविण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला आहे. सध्या जिल्हाभरात रस्त्यांची माहिती घेण्याचे काम चालू असून, त्याचे नियोजन पूर्ण होताच जिल्ह्यातील सहा आगारांमध्ये ही यंत्रणा सुरू होणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली.  या यंत्रणेमुळे प्रवाशांना बसचे लोकेशन, ती येण्यास लागणारा वेळ आदी गोष्टी बसस्टॅँडवर लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्डद्वारे तसेच स्वत:च्या मोबाइलमधील याच सेवेच्या अ‍ॅपद्वारे लघुसंदेशाद्वारे समजणार आहे. बसची प्रतीक्षा किती काळ करावी लागेल? याचे चित्रही त्यामुळे स्पष्ट होणार आहे.  हा प्रयोग नाशकात यशस्वी झाला तर त्याचा राज्यात सर्वत्र वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आंध्र प्रदेश परिवहन महामंडळात हा प्रयोग २०१४ पासून राबविण्यात येत असून, तेथे त्याला चांगले यशही मिळत आहे. यामुळे महामंडळाच्या सेवेचा दर्जा वाढण्यास मदत मिळणार आहे. ही यंत्रणा देशात काही परिवहन महामंडळात पूर्वीपासून राबविण्यात येत आहे. यात प्रवाशांची वेळेची बचत, यंत्रणेचा सुयोग्य वापर, प्रवाशांची वाढती संख्या असे अगणित फायदे होत आहे.रेल्वेच्या धर्तीवर असणाºया या यंत्रणेमुळे दीर्घ पल्ल्याच्या बसला काही कारणांमुळे उशीर होत असेल तर त्याची आगाऊ कल्पना मिळत असल्याने प्रवासी त्याचे नियोजन करू शकतात. याशिवाय लहान-मोठ्या अंतरावरील बसप्रवासातही याचा चांगला उपयोग होणार आहे. प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो.ई-टॅगमुळे सोय, पण...राज्यात सर्वत्र बसेसना टोल देण्यासाठी टोलनाक्यावर रोख पैसे भरून पावती घेतली जात होती. आता बहुतांशी ठिकाणी ‘ई-टॅग’ सेवा सुरू करण्यात आली आहे. यात कॅशलेस पद्धतीने टोल भरला जात आहे. प्री-पेड मोबाइल सेवेप्रमाणे हे काम असून, रोख रक्कम हाताळण्याचा ताण यामुळे वाचला आहे. पूर्वी रोख रक्कम देत टोल भरल्यास शासनाकडून रकमेत सूट मिळत होती. ती सूट या सेवेतही मिळणार का? आणि बॅँकांच्या सेवाशुल्काचे काय? हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. सध्या बँका यात कुठलेही शुल्क आकारत नसल्याचे समजते; पण भविष्यात त्या सेवाशुल्क आकारू शकतील त्यामुळे यात टोलचा खर्च वाढणार आहे.नाशिकहून दोन स्लीपर शिवशाहीया महिन्यापासून नाशिकहून नागपूर व कोल्हापूरसाठी दोन स्लीपर शिवशाही बस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या त्या एकेकच असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहता त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिक शहरातून पुणे-मुंबईसह राज्याच्या निरनिराळ्या भागात सध्या  ६४ शिवशाही धावत असून, त्यातील काही बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम आहे तर काही बसेसना प्रतिसाद अत्यल्प आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ