शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:16 IST

महाराज्य राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या व्हीटीएसपीआयएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि पॅसेंजर इन्फरमेशन सिस्टीमचा पायलेट प्रोजेक्ट राबविण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला आहे. सध्या जिल्हाभरात रस्त्यांची माहिती घेण्याचे काम चालू असून, त्याचे नियोजन पूर्ण होताच जिल्ह्यातील सहा आगारांमध्ये ही यंत्रणा सुरू होणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली.

नाशिक : महाराज्य राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यभरात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या व्हीटीएसपीआयएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि पॅसेंजर इन्फरमेशन सिस्टीमचा पायलेट प्रोजेक्ट राबविण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला आहे. सध्या जिल्हाभरात रस्त्यांची माहिती घेण्याचे काम चालू असून, त्याचे नियोजन पूर्ण होताच जिल्ह्यातील सहा आगारांमध्ये ही यंत्रणा सुरू होणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली.  या यंत्रणेमुळे प्रवाशांना बसचे लोकेशन, ती येण्यास लागणारा वेळ आदी गोष्टी बसस्टॅँडवर लावण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्डद्वारे तसेच स्वत:च्या मोबाइलमधील याच सेवेच्या अ‍ॅपद्वारे लघुसंदेशाद्वारे समजणार आहे. बसची प्रतीक्षा किती काळ करावी लागेल? याचे चित्रही त्यामुळे स्पष्ट होणार आहे.  हा प्रयोग नाशकात यशस्वी झाला तर त्याचा राज्यात सर्वत्र वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आंध्र प्रदेश परिवहन महामंडळात हा प्रयोग २०१४ पासून राबविण्यात येत असून, तेथे त्याला चांगले यशही मिळत आहे. यामुळे महामंडळाच्या सेवेचा दर्जा वाढण्यास मदत मिळणार आहे. ही यंत्रणा देशात काही परिवहन महामंडळात पूर्वीपासून राबविण्यात येत आहे. यात प्रवाशांची वेळेची बचत, यंत्रणेचा सुयोग्य वापर, प्रवाशांची वाढती संख्या असे अगणित फायदे होत आहे.रेल्वेच्या धर्तीवर असणाºया या यंत्रणेमुळे दीर्घ पल्ल्याच्या बसला काही कारणांमुळे उशीर होत असेल तर त्याची आगाऊ कल्पना मिळत असल्याने प्रवासी त्याचे नियोजन करू शकतात. याशिवाय लहान-मोठ्या अंतरावरील बसप्रवासातही याचा चांगला उपयोग होणार आहे. प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो.ई-टॅगमुळे सोय, पण...राज्यात सर्वत्र बसेसना टोल देण्यासाठी टोलनाक्यावर रोख पैसे भरून पावती घेतली जात होती. आता बहुतांशी ठिकाणी ‘ई-टॅग’ सेवा सुरू करण्यात आली आहे. यात कॅशलेस पद्धतीने टोल भरला जात आहे. प्री-पेड मोबाइल सेवेप्रमाणे हे काम असून, रोख रक्कम हाताळण्याचा ताण यामुळे वाचला आहे. पूर्वी रोख रक्कम देत टोल भरल्यास शासनाकडून रकमेत सूट मिळत होती. ती सूट या सेवेतही मिळणार का? आणि बॅँकांच्या सेवाशुल्काचे काय? हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. सध्या बँका यात कुठलेही शुल्क आकारत नसल्याचे समजते; पण भविष्यात त्या सेवाशुल्क आकारू शकतील त्यामुळे यात टोलचा खर्च वाढणार आहे.नाशिकहून दोन स्लीपर शिवशाहीया महिन्यापासून नाशिकहून नागपूर व कोल्हापूरसाठी दोन स्लीपर शिवशाही बस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या त्या एकेकच असल्या तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहता त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिक शहरातून पुणे-मुंबईसह राज्याच्या निरनिराळ्या भागात सध्या  ६४ शिवशाही धावत असून, त्यातील काही बसेसना प्रवाशांचा प्रतिसाद उत्तम आहे तर काही बसेसना प्रतिसाद अत्यल्प आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ