शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवर श्रमदानातून विविध कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 14:39 IST

त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेल्या लहानमोठ्या झाडांना तेथीलच लहान मोठ्या दगडांच्या सहाय्याने पार करणे, ओटे तयार करणे, पावसाचे पाणी वाहुन जाऊ नये म्हणुन झाडांना ओटे तयार करण्याचे काम येथील पर्यावरणावादी सेवाभावी आयपीएल गु्रुपतर्फे श्रमदानातून करण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेल्या लहानमोठ्या झाडांना तेथीलच लहान मोठ्या दगडांच्या सहाय्याने पार करणे, ओटे तयार करणे, पावसाचे पाणी वाहुन जाऊ नये म्हणुन झाडांना ओटे तयार करण्याचे काम येथील पर्यावरणावादी सेवाभावी आयपीएल गु्रुपतर्फे श्रमदानातून करण्यात येत आहे. त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार व ब्रह्मगिरी हे दोन सुप्रसिद्ध पहाड असून गंगाद्वार येथे वरपर्यंत जाण्याकरता ७५० पायºया आहेत तर ब्रम्हगिरीवर जाण्यासाठी अर्धा रस्ता कच्चा होता तर भातखळ्यापासुन पुढे ५५० पायºया आहेत. आता संपुर्ण रस्त्यावर खालपासुन वर जिन्यापर्यंत सिंहस्थात पायºया तयार केल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पुर्वी दाट जंगल होते. मात्र गेल्या दहा ते १५ वर्षांपासून कमी पावसामुळे वृक्षराजी कमी झाली आहे. जंगल राहिलेच नाही. पाऊस कमी झाला आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडुन प्रदूषण वाढत आहे. यासाठी आयपीएल या सेवाभावी ग्रुपच्या सदस्यांनी एक मोठे काम श्रमदानातुन हाती घेतले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करणे, या झाडांना पाणी राहण्यासाठी झाडांभोवती आळे तयार करु न पाणी भरणे, झाडांभोवती तेथीलच दगडांचा पार (ओटा) तयार करणे, मोठ्या झाडांना चुना गेरु लावणे इत्यादी कामे थेट श्रमदानातून सुरु आहेत. थोडक्यात सांगायचे तर झाडांभोवती पाणी अडविणे व पाणी जिरविणे. पावसाळ्यात पडणारे पाणी वाहुन न जाता ते अडविणे हा प्रमुख उद्देश्य या मागे असल्याचे ग्रुपच्या ललित लोहगावकर , अ‍ॅड.पराग दीक्षित, सचिन कदम यांनी सांगितले.----------टाकाऊपासून टिकाऊ...विशेष म्हणजे याच मंडळाने टाकाऊ पासुन टिकाऊ ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. ती संकल्पना म्हणजे मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्यांद्वार तीन ते चार माणसे बसतील अशी छोटी होडी तयार केली होती. गेल्या दोन वर्षांपासुन गावातील सार्वजानिक गणपती घरातील गणपती विसिर्जत करण्याचे काम करीत आहे. असे सामाजिक काम आयपीएल गु्रपतर्फे सुरू आहे. याशिवाय गावातील हरित ब्रह्मगिरी ग्रुप युथ फाउंडेशन हे ग्रुपदेखील पर्यावरणाच्या दृष्टीने सतत कार्यरत असतात. गोदामाता पूर्वीप्रमाणेच खळाळत वाहिली पाहिजे तिला पुर्ववैभव प्राप्त व्हावे यासाठी गावातील अनेक लोक या सेवाभावी कार्यात सहभागी आहेत. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह , गोदावरी गटारीकरण मोहीमेचे राजेश पंडीत आदी कायमच सहभागी होत असतात. या सर्वांच्या प्रयत्नासह त्र्यंबकेश्वर वनविभाग देखील हिरीरीने सहभागी होउन पर्यावरण साधण्यासाठी सहभागी होत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक