शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

मोदी सरकार पायउतार होईपर्यंत 'तो' अर्धनग्न राहणार होता, पण आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 10:47 IST

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिंपळगाव बसवंतला झालेल्या सभेपूर्वीही डोंगरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तर शरद पवार यांच्या सभेत त्यांनी अर्धनग्न अवस्थेतच व्यासपीठावर जात निवेदन दिले होते.

पाटोदा - लोकसभा निवडणुकीत शेतकरीविरोधी सरकार म्हणून आरोप करत केंद्रातील मोदी सरकार जोपर्यंत पायउतार होत नाही तोपर्यंत अंगात शर्ट-बनियन न घालता अर्धनग्न आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे नगरसूल, ता. येवला येथील शेतकरी कृष्णा भगवान डोंगरे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानापर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. 

लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत अपेक्षाभंग झालेल्या डोंगरे यांनी सावध पवित्रा घेत विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवसापर्यंत आंदोलनाचा कालावधी वाढविला आहे. गेल्या दोन वर्षापासून नगरसूल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने विविध अनोखे आंदोलने करत भाजपा सरकारची डोकेदुखी वाढविली आहे. तालुक्यातील पूर्वोत्तर दुष्काळी असलेल्या नगरसूल गावात कृष्णा आपल्या कुटुंबासह शेती करतो. सन 2017 मध्ये कांद्याला 100 ते 125 रुपये भाव मिळाला म्हणून डोंगरे यांनी पाच एकर पिकाला अग्निडाग देत सरकारचा प्रतीकात्मक निषेध केला होता. 

त्यानंतर येवला तालुका दुष्काळी जाहीर करावा यासाठी 24 ऑक्टोबर 2018 रोजी मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहित मागणी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस हे सरकार चालविताना उत्कृष्ट अभिनय करत असल्याचा आरोप करत त्यांना अल्बम काढण्यासाठी 500 रुपयांचे निधी देण्याचे त्यांनी जाहीर केल्याने येवल्यातील मुख्यमंत्र्यांच्या सभेअगोदर त्यांना पोलिसांनी स्थानबद्धही केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरे यांनी केंद्रातील पार्श्वभूमीवर डोंगरे यांनी केंद्रातील मोदी सरकार जोपर्यंत पायउतार होत नाही तोवर अंगात शर्ट व बनियन न घालता अर्धनग्न आंदोलन पुकारले होते. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पिंपळगाव बसवंतला झालेल्या सभेपूर्वीही डोंगरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तर शरद पवार यांच्या सभेत त्यांनी अर्धनग्न अवस्थेतच व्यासपीठावर जात निवेदन दिले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तारुढ झाल्यानंतर डोंगरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक निकालाने अपेक्षाभंग झालेल्या डोंगरे यांनी आता सावध भूमिका घेत राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानापर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. 

शासनाने शेतकऱ्यांना फसविल्यामुळेच शासनाविरुद्ध मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे मला हे आंदोलन करावे लागत आहे. लोकसभा निवडणूक झाली मात्र आता विधानसभेच्या मतदानापर्यंत माझे आंदोलन सुरुच राहील. आता तरी सरकारला जाग यावी - कृष्णा डोंगरे, शेतकरी 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019