शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली बाजारपेठ अस्थिर करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:06 IST

पर्यावरणाचा -हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी आणली असून, शनिवार(दि. २३) पासून संपूर्ण राज्यभरात प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नाशिकमध्येही प्लॅस्टिकबंदीचे पडसाद उमटले.

नाशिक : पर्यावरणाचा -हास होत असल्याच्या कारणावरून राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी आणली असून, शनिवार(दि. २३) पासून संपूर्ण राज्यभरात प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नाशिकमध्येही प्लॅस्टिकबंदीचे पडसाद उमटले. कापड आणि किराणा व्यावसायिकांसह प्लॅस्टिकवर आधारित व्यवसायचालकांनी प्लॅस्टिकबंदीच्या नावाखाली बाजारपेठ अस्थिर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत ब्रँडेड मालाला सशर्त परवानगी देऊन सर्वसामान्य व्यावसायिकांवर अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त केली. तर व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये पर्यायी व्यवस्थेशिवाय केलेल्या प्लॅस्टिकबंदीविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. प्लॅस्टिकबंदीमुळे किराणा दुकानदारांसमोर किरकोळ मालाची विक्री कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक किंवा दोन किलोपेक्षा अधिक वजनाचे पुडे बांधणे शक्य होत नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले. त्यामुळे बहुतांश दुकानांमध्ये प्लॅस्टिकमधील पॅकिंगच्या वस्तू जशाच्या तशा शनिवारीही दिसून आल्या. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी सकाळपासूनच प्लॅस्टिकचा वापर करणाºया दुकानदारांसह ग्राहकांवरही कारवाई सुरू केली असली तरी त्याचा परिणाम रस्त्यावर अनधिकृतपणे विविध वस्तूंची विक्री करणाºया विक्रेत्यांवरही दिसून आला नाही. रस्त्यावर विविध वस्तू प्लॅस्टिक वेष्टनासह विक्रीसाठी उपलब्ध होत्या, तर काही कापड व्यापारी आणि किराणा दुकानदारांनी कारवाईचा धसका घेत दुकानातील प्लॅस्टिक घाई गडबडीने हटविण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले. दरम्यान, सरकारने घाईघाईने केलेली प्लॅस्टिकबंदी उद्योग व्यवसायाला मारक असून, टप्प्याटप्प्याने व प्लॅस्टिकला पर्याय निर्माण करून सरकारने प्लॅस्टिकबंदी करणे गरजेचे होते, असे मत व्यापा-यांनी  व्यक्त केले. तसेच प्लॅस्टिकच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यास त्याच्या पुनर्वापरासाठी संकलन करण्याची तयारीही व्यापाºयांनी दाखविली आहे.प्लॅस्टिक सर्वांचीच गरजबाजारातील दैनंदिन गरजेच्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये ५० ते ६० टक्के भाग प्लॅस्टिक पिशव्यांचा असून, पिशव्या मिळत असल्याने त्यांचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले नव्हते. द्रवपदार्थांसह विविध किराणा मालातील वस्तू व दैनंदिन गरजांसाठी प्लॅस्टिक आवश्यक असून, त्याला समांतर पर्यायाशिवाय बंदी आणल्यामुळे सर्वांचीच गैरसोय होणार असल्याचे मत प्लॅस्टिक पिशव्यांचे वितरक आशिष बाफना यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी