शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

अवकाळी पावसाने मोडला अर्थिक कणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:56 PM

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात मागील काही दिवसांपुर्वी अवकाळी व बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने तालुक्याचा आर्थिक कणा मोडला आहे.

ठळक मुद्देनुकसानीत वाढ : द्राक्षे उत्पादक, विटभट्टीचालक देशोधडीला

लखमापुर : दिंडोरी तालुक्यात मागील काही दिवसांपुर्वी अवकाळी व बेमोसमी पावसाने धिंगाणा घातल्याने तालुक्याचा आर्थिक कणा मोडला आहे.तालुक्याला द्राक्षे उत्पादक क्षेत्रातील द्राक्षेपंढरी या नावाने सर्वत्र ओळखले जाते. परंतु या द्राक्षेपंढरीला निसर्गाच्या वक्रदृष्टीचे एकप्रकारे ग्रहण लागले आहे. मागील हंगाम कोरोनामुळे वाया गेला. आता या हंगामात झालेले नुकसान भरून निघेल, या आशेवर तग धरून बळीराजाने मिळेल त्या ठिकाणाहून भांडवल उभे करून द्राक्षे हंगामास सुरुवात केली. परंतु अस्मानी संकटाचा घाला घातला व होत्याचे नव्हते करून टाकले.या अवकाळी पावसाने अंतिम टप्प्यात असणाऱ्या द्राक्ष बागा पुर्णपणे तडे गेल्यामुळे मोठ्या आर्थिक हानीचा फटका शेतकरी वर्गाला बसला. या अवकाळी पावसाने तोंडाजवळ आलेला उत्पन्नांचा भाग निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे हिरावून गेला.दिंडोरी तालुक्यात जवळ जवळ ७० टक्के द्राक्षबागा आहेत. परंतु दोन ते तीन वर्षापासुन अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल, परतीचा पाऊस, कोरोना, बेमोसमी पडणारा पाऊस आदींमुळे प्रत्येक हंगामात शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला आहे.अवकाळी पावसाने लखमापुर, पिंपरखेड, नळवाडी, करजंवण, अवनखेड, दहेगाव, वागळूद आदी गावांना मोठा धक्का दिला आहे. यामध्ये जवळपास कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले असून परत एकदा या द्राक्षे पंढरीतील बळीराजांवर आर्थिक संकटांची कु-हाड कोसळली आहे. त्यामुळे विविध बँका, सहकारी सोसायटी, पतसंस्था, व इतर ठिकाणांहून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या समस्यांनी शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.ज्या द्राक्षे बागांच्या घडांना तडे गेलेले आहेत. त्यांना घेण्यासाठी द्राक्षे व्यापारी वर्ग आपली नापसंती दाखवित असल्याने आता पुढे काय? असा सवाल शेतकरी वर्गासमोर उभा राहिला आहे.नैसर्गिक आपत्तीने झालेले नुकसान कसे भरून मिळेल याकडे सर्व शेतकरी वर्गाच्या नजरा लागल्या आहेत.गहु, हरभरा व इतर नगदी भांडवल देणा-या पिकांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने यंदा या पिकांच्या उत्पादन क्षमतेवर मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा या पिकांची जी सरासरी मिळते. ती मिळणे आता शक्य नाही. असे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.दिंडोरी तालुक्यात लखमापुर, करजंवण, दिंडोरी, नाळेगाव, वरखेडा इ्यादी गावांमध्ये विटभट्टी मोठ्या प्रमाणावर आहे. दोन वेळा झालेल्या अवकाळी पावसाने तयार केलेल्या कच्च्या विटा पुर्णपणे जमीनदोस्त करून टाकल्या आहेत. त्यामुळे विटभट्टीचालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता कच्च्या मालाचे पैसे, मजुरी कशी फेडावी ही समस्या विटभट्टीचालकांना भेडसावत आहे.मागील हंगाम कोरोनामुळे वाया गेला. त्यात एक वर्षभर एक पैसाही हातात आला नाही. आता व्यवसाय सुरू झाला आणि निसर्गाच्या वक्रदृष्टीने तेही हिरावून घेतल्याने विटभट्टीचालक याही वर्षी आर्थिक संकटाच्या दरीत कोसळले आहे. या अवकाळी व बेमोसमी पावसाने जवळजवळ दिंडोरी तालुक्यातील आर्थिक कणाच मोडला आहे.मागील तीन चार वर्षांपासून द्राक्षे पिकांने साथ दिली नाही. परंतु यंदा मिळेल त्या ठिकाणाहून भांडवल उभे करून मोठ्या मेहनतीने द्राक्षे बागा तयार केल्या व मनासारखे पिकही आले. परंतु अवकाळी पावसाने संपूर्ण द्राक्षे घडांना तडे गेल्याने आमचे भांडवल, मजुरी, केलेला खर्च पुर्णपणे मातीला मिळाळा. आम्ही परत एकदा आर्थिक संकटांच्या दरीत सापडलो आहोत.- मनोज राजदेव, शेतकरी, लखमापुर.  

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती