शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

समाजातील सज्जनशक्तीचा अनोखा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 00:33 IST

दीड वर्षांचा कोरोना काळ हा प्रत्येकाची कसोटी पाहणारा होता. त्याच्या कटुस्मृती पुसता न येणाऱ्या आहेत. तरीही त्यावर मात करीत दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. माणुसकीचा प्रत्यय देणारे उपक्रम राबविले गेले. आदिवासी पाडे, झोपडपट्टीतील वंचित बांधवांपर्यंत फराळ, कपडे अशा माध्यमातून शहरी लोक पोहोचले. मूळ गावी जाऊन दिवाळी साजरी करत असताना श्रमदानातून बंधारे, कच्चे रस्ते बांधण्याचे उपक्रम काही गावांमध्ये हाती घेण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळावा घेत असताना शाळेसाठी अर्थसाहाय्य केले. वस्तूरुपाने मदत केली.

ठळक मुद्देकोरोना काळातील दु:ख विसरून समाजातील वंचितांच्या मदतीसाठी पुढाकार

मिलिंद कुलकर्णीदीड वर्षांचा कोरोना काळ हा प्रत्येकाची कसोटी पाहणारा होता. त्याच्या कटुस्मृती पुसता न येणाऱ्या आहेत. तरीही त्यावर मात करीत दिवाळी सण उत्साहात साजरा झाला. माणुसकीचा प्रत्यय देणारे उपक्रम राबविले गेले. आदिवासी पाडे, झोपडपट्टीतील वंचित बांधवांपर्यंत फराळ, कपडे अशा माध्यमातून शहरी लोक पोहोचले. मूळ गावी जाऊन दिवाळी साजरी करत असताना श्रमदानातून बंधारे, कच्चे रस्ते बांधण्याचे उपक्रम काही गावांमध्ये हाती घेण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळावा घेत असताना शाळेसाठी अर्थसाहाय्य केले. वस्तूरुपाने मदत केली. सज्जनशक्तीचा हा अनोखा प्रत्यय दिलासादायक आहे.न भूतो न भविष्यती असा कोरोना काळ सगळ्यांनी अनुभवला. त्यातून बाहेर पडायला काही काळ जाऊ द्यावा लागेल. भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवाने लोकांमध्ये ऊर्जा निर्माण होते, त्याचा प्रत्यय दिवाळी सणामध्ये आला. दु:ख विसरून प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार सण साजरा केला. घरामधील जिवलग व्यक्ती या काळात हिरावली गेली, त्या दु:खाची छाया या उत्सवावर असली तरी इतरांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न झाला. ह्यइंडियाह्ण आणि ह्यभारतह्ण अशा चर्चा अधूनमधून झडतात आणि समाजातील दरी, विसंगतीवर बोट ठेवले जाते. पण या वादात न पडता वंचितांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून प्रयत्न झाले. आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन दिवाळी फराळ तसेच नवीन कपडे देण्यात आले. केवळ ह्यवाटपह्ण करणे अशी औपचारिकता नव्हती, तर त्यांच्यासोबत एक दिवस घालविण्यात आला. झोपडपट्टीतील वंचितांनाही अशी मदत करण्यात आली. त्यासाठी संस्था, संघटनांनी पूर्वतयारी, पूर्वनियोजन केले. प्रत्येकाला खारीचा वाटा उचलता यावा, यासाठी आवाहन केले. पाड्यात जाण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर त्यांना सोबत घेण्यात आले. पारदर्शकता जपण्यात आली. कोठेही याची प्रसिध्दी नाही. चर्चा नाही. फलकबाजी नाही, भाषणबाजी नाही. ही सज्जनशक्ती समाजाचे बळ आहे. ती जपायला हवी.श्रमसंस्काराची जपणूककोरोना काळात माणसे घरात कोंडली गेली होती. दोन लाटा येऊन गेल्या, तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही सर्व बंधने पाळून लोकांची मूळ गावाकडे पावले वळाली. नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळींच्या भेटी, सहवास हा ऊर्जा, उत्साह देणारा असतो. त्यामुळे दीड वर्ष भेटीगाठी झाल्या नसल्याने ओढ अधिक वाढली; पण गावात जाऊनही केवळ गप्पाटप्पा, आराम, पर्यटन, असे न करता लोकांनी गावाच्या गरजा ओळखून श्रमदान केले. कच्चे बंधारे बांधले, शेतवाटा तयार केल्या. गावातील, गल्लीतील लोकांनी एकत्र येऊन केलेले हे श्रमदान सकारात्मक पायंडा तयार करणारे ठरले. परगावी राहणाऱ्या लोकांना गावाची असलेली ओढ, आपल्या गावात सोयी-सुविधा व्हाव्यात यासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे त्यांनी उचललेले पाऊल खूप महत्त्वाचे आहे. असाच उत्साह माजी विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. दहावीच्या विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करीत गट तयार केले. स्नेहमेळावा गावात, शाळेत घेऊन जुन्या स्मृतींना उजाळा दिला. त्यासोबतच शाळेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी, पायाभूत सुविधांसाठी अर्थसाहाय्य, वस्तुरूपाने मदत केली. आणखी काय करता येईल, यासंबंधी विचारमंथन केले. आपल्या गावाविषयी, शाळेविषयी असलेली आस्था, जिव्हाळा यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला. या सकारात्मक गोष्टी पाहता ग्रामस्थांचीही जबाबदारी वाढली आहे. गावकीच्या राजकारणात गावाचा विकास कुठे रुतला आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मूळ रहिवासी असलेल्या; परंतु वेगवेगळ्या शहरांत, देशात राहणाऱ्या नागरिकांच्या ज्ञानाचा, मदतीचा लाभ गावासाठी व्हावा, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. आठवड्यासाठी, एक दिवसासाठी गावात येणाऱ्या मूळ रहिवाशांनी केलेले श्रमदान, दातृत्व पाहता त्यांची या मातीशी जुळलेली नाळ, या मातीविषयी त्यांना असलेली ओढ दिसून आली. आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांना योगदान देण्याची इच्छा आहे. फक्त राजकारण, श्रेयवाद यात पडण्याची त्यांची इच्छा नसते. पारदर्शकतेने कामे झाल्यास मदतीसाठी अनेक हात पुढे येऊ शकतात. कोरोनापश्चात या काळात हा विश्वास गावकऱ्यांना मिळाला, हे महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :SocialसामाजिकDiwaliदिवाळी 2021