शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

मालक-कामगारांत निर्माण झाले अनोखे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:23 IST

सातपूर (गोकुळ सोनवणे) : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यास आता दोन महिने होत असून, या काळात सर्वच कारखान्यांचे उत्पादन बंद आहेत. काही ठिकाणी कामगार कपात तर काही ठिकाणी वेतनकपात करण्यात येत आहे, अशा कालावधीत नाशिकमध्ये काही कारखान्यांत तर व्यवस्थापनाने कामगारांची काळजी घेतल्याने या संकटकाळात कामगार व्यवस्थापन यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत झाली आहे. औद्योगिक क्षेत्र म्हटले की कामगार आणि व्यवस्थापन या दोन बाजू आल्याच.

सातपूर (गोकुळ सोनवणे) : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यास आता दोन महिने होत असून, या काळात सर्वच कारखान्यांचे उत्पादन बंद आहेत. काही ठिकाणी कामगार कपात तर काही ठिकाणी वेतनकपात करण्यात येत आहे, अशा कालावधीत नाशिकमध्ये काही कारखान्यांत तर व्यवस्थापनाने कामगारांची काळजी घेतल्याने या संकटकाळात कामगार व्यवस्थापन यांच्यातील संबंध दृढ होण्यास मदत झाली आहे. औद्योगिक क्षेत्र म्हटले की कामगार आणि व्यवस्थापन या दोन बाजू आल्याच.काही ठिकाणी वेतनकपात तर काही ठिकाणी कामगार कपातीच्या चर्चा आहेत. मात्र, बहुतांश कंपन्यांमध्ये सुटीच्या काळात जरी कामगारांना वेतन दिले गेले आहे. नाशिकच्या बॉश कंपनीत तर संकटकाळातदेखील कामगारांना प्रती महिना दहा हजार रुपये वेतनवाढीचा करार झाला आहे. याशिवाय अनेक कारखान्यांत मालक म्हणजेच व्यवस्थापनाने कामगारांची खूपच काळजी घेतली आहे. कारखाने बंद असले तरी कामगारांशी संपर्क साधून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करू न घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या काळात कोणालाही काही अडचण आली तर संपर्क साधण्याचे सांगितले जात आहे. एवढेच काय काही कामगारांच्या घरी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा केला जात आहे. नाशिकच्या युनायटेड हिट ट्रान्सफर प्रा. लिमी. ही कंपनीदेखील अशाच प्रकारचे काम करीत असल्याने चर्चेत आली आहे. या कंपनीने कामगारांना नियमित वेतन तर दिलेच, परंतु लॉकडाउन काळात जीवनावश्यक वस्तूंचादेखील घरपोच पुरवठा केला आहे त्यामुळे अशाप्रकारच्या संकटकाळातील आधारामुळे कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील हे नाते संकटकाळात अधिक घट्ट होताना दिसत आहे. हे नाते असेच टिकल्यास औद्योगिक क्षेत्रात कुठेही वादविवाद, संघर्ष दिसून येणार नाही.-------------लॉकडाउन जाहीर झाल्यापासून कारखान्याचे संचालक विवेक पाटील यांनी एचआर विभागाच्या माध्यमातून आमचे दोन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपवर आम्ही आमच्या अडचणी मांडतो. त्या अडचणी सोडविल्या जातात. दोन सहकाऱ्यांना किराणामालाची अडचण होती. त्यांना किराणा घरपोच देण्यात आला. कंपनीतर्फे १६७ कामगारांना फळे पोहोचविण्यात आले. दररोज आमचा आढावा घेतला जातो. काही कंत्राटी कामगारांना जीवनावश्यक वस्तूंसह गॅस सिलिंडरची व्यवस्था मालकांनी करून दिली आहे.- सागर गडाख, कामगार, युनायटेड हिट ट्रान्स्फर, अंबड

टॅग्स :Nashikनाशिक