शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काशी ते दक्षिण काशीची अनोखी यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:16 IST

नाशिक : प्रख्यात खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ ...

नाशिक : प्रख्यात खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. मात्र, त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, काशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांचे बालपणाचे सारे शिक्षण काशीत झाले असून मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा साहित्यातील सर्वेाच्च सन्मान दक्षिण काशी म्हणून सर्वज्ञात असलेल्या नाशिकमध्ये मिळणार आहे. त्यामुळे डॉ. नारळीकर यांच्या निमित्ताने ही दोन तीर्थक्षेत्रे वैज्ञानिक दृष्टीने जोडली जाणार आहेत.

डॉ. नारळीकर यांच्या मातोश्री सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. त्यामुळे माता-पिता दोघांकडूनच त्यांना शिक्षणाचे बाळकडू मिळालेले होते. वयाच्या २१ व्या वर्षी १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी मिळवतानादेखील प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांनी पीएचडी, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. १९७२ साली भारतात परतल्यावर त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात विभागप्रमुख म्हणून कार्य केले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.

इन्फो

साहित्यिक कामगिरी

संशोधनाबरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत. त्यांनी लिहलेल्या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने अंतराळातील भस्मासुर , अंतराळातील स्फोट, अभयारण्य , चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, आत्मचरित्र चार नगरांतले माझे विश्व, पाहिलेले देश भेटलेली माणसं, समग्र जयंत नारळीकर तसेच पत्नी मंगला आणि डॉ. अजीत केंभावी यांच्यासमवेत लिहलेले नभात हसरे तारे अशा पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्यावर डॉ. विजया वाड यांनी 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे. जयंत नारळीकर यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.

इन्फो

संशोधनातील कार्याची महती

चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. त्यांचे संशोधन हे स्थिर स्थिती सिद्धान्त म्हणून प्रख्यात आहे. त्यांच्या संशोधन क्षेत्रातील अव्दितीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

इन्फो

सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित

१९६५ या वर्षी पद्मभूषण तर २००४ या वर्षी पद्मविभूषण या सर्वेाच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार, अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेला हा एक तासाचा लघुपट आहे.