शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दुर्दैवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:23 IST

हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आलेले ज्येष्ठ गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघात होऊन निधन झाले. त्यांच्यासोबत असलेल्या ३० अन्य ट्रेकर्सपैकी सुमारे ११ सहभागी सदस्यांना नाशिकच्या ट्रेकर्सच्या चमूने सुखरूप खिरेश्वर गावात आणले. सह्याद्रीच्या खोऱ्यातील विविध गड-किल्ल्यांवरील अवघड वाटा सर करणारे अभ्यासू गिर्यारोहक अरुण सावंत यांचा डोंगरदºयाच्या कुशीतच अपघाती मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रविवारी (दि. १९) आढळून आला.

नाशिक : हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आलेले ज्येष्ठ गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघात होऊन निधन झाले. त्यांच्यासोबत असलेल्या ३० अन्य ट्रेकर्सपैकी सुमारे ११ सहभागी सदस्यांना नाशिकच्या ट्रेकर्सच्या चमूने सुखरूप खिरेश्वर गावात आणले. सह्याद्रीच्या खोऱ्यातील विविध गड-किल्ल्यांवरील अवघड वाटा सर करणारे अभ्यासू गिर्यारोहक अरुण सावंत यांचा डोंगरदºयाच्या कुशीतच अपघातीमृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रविवारी (दि. १९) आढळून आला. सावंत हे तीस गिर्यारोहकांच्या गु्रपला घेऊन हरिश्चंद्रगडावर शनिवारी रॅपलिंगकरिता पोहचले होते.रॅपलिंगचा पहिला टप्पा पूर्ण करून त्यांच्या ग्रुपचे गिर्यारोहक खाली आले तेव्हा तेदेखील रॅपलिंगद्वारे कोकणकड्यावरून खाली येत होते; मात्र अचानकपणे त्यांचा ग्रुपशी संपर्क तुटला आणि ते संध्याकाळी बेपत्ता झाले. कोकणकड्याची सुमारे दोन हजार फूट उंची आहे. कोकणकड्यापासून जिथून सावंत यांचा संपर्क तुटला ती उंची एक हजार फुटांची आहे.रॅपलिंग करून खाली आलेल्या त्यांच्या ग्रुपच्या सदस्यांना ‘ट्रेकसोल’च्या नाशिक येथील गिर्यारोहक जे कॅम्पेनिंगकरिता थांबलेले होते. त्यांनी सकाळी रोहिदास गडावर ट्रेकिंगचा बेत रद्द करत सावंत ग्रुपचे गिर्यारोहक रॅपलिंगद्वारे खाली गेलेले आहे, त्यांना ‘रेस्क्यू’ करत वरच्या बाजूने सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘टास्क’ हाती घेतला.सर्व अत्यावश्यक साधने असल्यामुळे डॉ. अजय धोंडगे, डॉ. अजय जाधव, डॉ. हेमंत बोरसे, प्रसाद कुलकर्णी यांनी रविवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत त्या ग्रुपच्या एकूण ११ सदस्यांना सुखरूप ठाणे जिल्ह्णातील खिरेश्वर गावात आणले. हे सर्व ट्रेकर्स रात्री मुक्कामी गडावर थांबलेले होते.रविवारी त्यांचा रोहिदास गड चढण्याचा बेत होता; मात्र सावंत यांची दुर्दैवी घटना घडल्याने त्यांनी तो रद्द केला. हे नाशिककर गिर्यारोहक मूळ वैनतेय गिरीभ्रमण संस्थेशी जोडलेले आहे. डोंगरांवर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये हौशी पर्यटकांचा अधिक समावेश आहे. गिर्यारोहकांचा अपवादानेच अपघाती मृत्यू घडले आहेत, मात्र त्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचे वैनतेय संस्थेचे प्रशांत परदेशी यांनी सांगितले. सावंत हे मुरब्बी गिर्यारोहकांपैकी एक होते. त्यांचा अपघाती मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे परेदशी म्हणाले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू