शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

गिर्यारोहक अरुण सावंत यांचा दुर्दैवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:23 IST

हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आलेले ज्येष्ठ गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघात होऊन निधन झाले. त्यांच्यासोबत असलेल्या ३० अन्य ट्रेकर्सपैकी सुमारे ११ सहभागी सदस्यांना नाशिकच्या ट्रेकर्सच्या चमूने सुखरूप खिरेश्वर गावात आणले. सह्याद्रीच्या खोऱ्यातील विविध गड-किल्ल्यांवरील अवघड वाटा सर करणारे अभ्यासू गिर्यारोहक अरुण सावंत यांचा डोंगरदºयाच्या कुशीतच अपघाती मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रविवारी (दि. १९) आढळून आला.

नाशिक : हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी आलेले ज्येष्ठ गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघात होऊन निधन झाले. त्यांच्यासोबत असलेल्या ३० अन्य ट्रेकर्सपैकी सुमारे ११ सहभागी सदस्यांना नाशिकच्या ट्रेकर्सच्या चमूने सुखरूप खिरेश्वर गावात आणले. सह्याद्रीच्या खोऱ्यातील विविध गड-किल्ल्यांवरील अवघड वाटा सर करणारे अभ्यासू गिर्यारोहक अरुण सावंत यांचा डोंगरदºयाच्या कुशीतच अपघातीमृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रविवारी (दि. १९) आढळून आला. सावंत हे तीस गिर्यारोहकांच्या गु्रपला घेऊन हरिश्चंद्रगडावर शनिवारी रॅपलिंगकरिता पोहचले होते.रॅपलिंगचा पहिला टप्पा पूर्ण करून त्यांच्या ग्रुपचे गिर्यारोहक खाली आले तेव्हा तेदेखील रॅपलिंगद्वारे कोकणकड्यावरून खाली येत होते; मात्र अचानकपणे त्यांचा ग्रुपशी संपर्क तुटला आणि ते संध्याकाळी बेपत्ता झाले. कोकणकड्याची सुमारे दोन हजार फूट उंची आहे. कोकणकड्यापासून जिथून सावंत यांचा संपर्क तुटला ती उंची एक हजार फुटांची आहे.रॅपलिंग करून खाली आलेल्या त्यांच्या ग्रुपच्या सदस्यांना ‘ट्रेकसोल’च्या नाशिक येथील गिर्यारोहक जे कॅम्पेनिंगकरिता थांबलेले होते. त्यांनी सकाळी रोहिदास गडावर ट्रेकिंगचा बेत रद्द करत सावंत ग्रुपचे गिर्यारोहक रॅपलिंगद्वारे खाली गेलेले आहे, त्यांना ‘रेस्क्यू’ करत वरच्या बाजूने सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘टास्क’ हाती घेतला.सर्व अत्यावश्यक साधने असल्यामुळे डॉ. अजय धोंडगे, डॉ. अजय जाधव, डॉ. हेमंत बोरसे, प्रसाद कुलकर्णी यांनी रविवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत त्या ग्रुपच्या एकूण ११ सदस्यांना सुखरूप ठाणे जिल्ह्णातील खिरेश्वर गावात आणले. हे सर्व ट्रेकर्स रात्री मुक्कामी गडावर थांबलेले होते.रविवारी त्यांचा रोहिदास गड चढण्याचा बेत होता; मात्र सावंत यांची दुर्दैवी घटना घडल्याने त्यांनी तो रद्द केला. हे नाशिककर गिर्यारोहक मूळ वैनतेय गिरीभ्रमण संस्थेशी जोडलेले आहे. डोंगरांवर झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये हौशी पर्यटकांचा अधिक समावेश आहे. गिर्यारोहकांचा अपवादानेच अपघाती मृत्यू घडले आहेत, मात्र त्याचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचे वैनतेय संस्थेचे प्रशांत परदेशी यांनी सांगितले. सावंत हे मुरब्बी गिर्यारोहकांपैकी एक होते. त्यांचा अपघाती मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे परेदशी म्हणाले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू