पेठ तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान
By Admin | Updated: May 21, 2014 00:06 IST2014-05-21T00:06:08+5:302014-05-21T00:06:08+5:30
पेठ : गेल्या तीन-चार दिवसांपासून पेठ तालुक्यात होणार्या वादळी पावसाने शेतीसह राहत्या घरांची दयनीय अवस्था केली

पेठ तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान
पेठ : गेल्या तीन-चार दिवसांपासून पेठ तालुक्यात होणार्या वादळी पावसाने शेतीसह राहत्या घरांची दयनीय अवस्था केली असून, जवळपास २८ गावांतील ३०५ घरांना या पावसाचा फटका बसला आहे़ रविवारपासून तालुक्यातील विविध भागात वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावली असून, पेठसह कोपुर्ली, जोगमोडी, हातरूंडी, माळेगाव, मोहपाडा आदि परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे़ तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी पिकांकडे वळू लागला असून, भाजीपाल्यासह टमाटे, मिरची, भोपळा, द्राक्षे, केळी अशी पिके घेऊ लागला असतानाच अवकाळी पावसाने हाती आलेले उत्पादन हिरावून नेले आहे़ यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, प्रशासनाकडून नुकसान झालेल्या घरांचा व पिकांचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे़