शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

वादग्रस्त पुलाला विनाचर्चा मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:07 IST

पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या गोदावरी नदीवरील दोन नव्या पुलांवरून गेल्यावर्षी भाजपमध्ये वाद पेटला होता. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या बैठकीत यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ऐन कोरोना संकटाच्या काळातदेखील धावपळीत बोलाविण्यात आलेल्या बैठकीच्या पहिल्याच सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या कामांना अशाच प्रकारे विकासाची कामे म्हणून विनाचर्चा मंजुरी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीत निर्णय : ५० कोटींच्या कामांना मान्यता

नाशिक : पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या गोदावरी नदीवरील दोन नव्या पुलांवरून गेल्यावर्षी भाजपमध्ये वाद पेटला होता. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१९) झालेल्या बैठकीत यातील एका १८ कोटी रुपयांच्या पुलास विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. ऐन कोरोना संकटाच्या काळातदेखील धावपळीत बोलाविण्यात आलेल्या बैठकीच्या पहिल्याच सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या कामांना अशाच प्रकारे विकासाची कामे म्हणून विनाचर्चा मंजुरी देण्यात आली आहे.मनपाच्या महासभेसाठी असलेल्या दालनात स्थायी समितीची सभा नूतन सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांना मान्यता देण्यात आली. परंतु सर्वाधिक महत्त्वाचा विषय गोदावरी नदीवरील पुलांचा होता. नदीच्या पुलापलीकडे निर्जन जागा असतानादेखील या ठिकाणी दोन पूल बांधण्यात येत असून, त्यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांचा आग्रह होता. तर आमदार देवयानी फरांदे यांच्यासह काही नगरसेवकांनी विरोध केला होता. जलसंपदा विभागाची कोणतीही परवानगी न घेतला हा पूल बांधण्यात येत आहे. मुळात पूररेषेची तीव्रता कमी करण्यासाठी नदी प्रवाहाचे अडथळे हटविण्याची केंद्र शासनाच्या एका संस्थेने महापालिकेला शिफारस केली असताना दुसरीकडे मात्र पूल बांधण्याचा प्रस्ताव होता. तो महासभेत गेल्यावेळच्या महापौरांनी मंजूर केला होता. तर यंदा सभापती गणेश गिते यांच्या काळात तो मंजुरीसाठी स्थायी समितीवर सादर होता. त्यानुसार १७ कोटी ९४ लाख रुपयांच्या या प्रस्तावाला भाजपच्या किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी चर्चेला मान्यता दिली.दरम्यान, या पहिल्याच बैठकीत सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यात सातपूर विभागात सुला वाइन चौक ते दत्तमंदिर दरम्यान नासर्डी नदीवर पूल बांधणे, विविध ठिकाणी मलनिस्सारण देखभाल दुरुस्ती, पाइपलाइन टाकणे, गळती बंद करणे अशाप्रकारच्या कामांचा समावेश होता. बैठकीत सुप्रिया खोडे यांनी प्रभागातील गोठ्यांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सभापतींनी ते शहराबाहेर हटविण्याचे आदेश दिले तर कल्पना पांडे यांनी प्रभागात पावसाळी पाण्याच्या निचºयासाठी दिलेले काम वर्षभरापासून होऊ शकले नाही, याबाबत तक्रार केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक