शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:05 AM

गंगापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणीकपात अंशत: रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा खंडित करून कोरडा दिवस पाळला जात होता.

नाशिक : गंगापूर धरणातपाणीसाठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणीकपात अंशत: रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा खंडित करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.महापालिकेत सोमवारी (दि.१५) आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी यांच्याबरोबरच गटनेते आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. महापौरांनी या निर्णयाची घोषणा केली.शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा कमी होत गेला. त्यातच धरणातील जलपातळी खालावली आणि निम्न पातळीवर पाणी घेणे महापालिकेला तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. त्यातच पावसाने ओढ दिल्याने नाशिककरांवर जलसंकट ओढवले होते. जुलैपर्यंत तरी शहराला पाणीपुरवठा होईल का, अशी शंका निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी धरणाची पाहणीदेखील केली होती. त्यानंतर आयुक्तांसमवेत प्रशासन आणि गटनेते यांच्यात बैठक झाली आणि त्यानंतर शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय झाला होता.त्यानुसार शहरात गेल्या ३० जूनपासून सर्व विभागात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेच्या सहा पैकी चार विभागांत दोन वेळा पाणीपुरवठा होतोतो एकवेळ करण्यात आला. त्यानंतरही तीन-चार दिवसांत पाणीपुरवठा न झाल्यास दर गुरुवारी ड्राय डे म्हणजे कोरडा दिवस पाळून पाणीपुरवठी करण्यात येईल असे ठरविण्यात आले होते. त्यानुसार ४ व ११ जुलै रोजी गुरुवारी शहरात ड्राय डे म्हणजेच कोरडा दिवस पाळण्यात आला होता. दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील ५३ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती.रविवारी (दि. १४) पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्यांच्या सूचनेनुसारच सोमवारी (दि.१५) तातडीने आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली आणि गंगापूर धरणासह अन्य धरणांतील साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार महापौरांनी गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केली. मात्र धरणातील साठा आणखी वाढत नाही तोपर्यंत संपूर्ण शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याचा निर्णय कायम राहील, असे त्यांनी सांगितले.या बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता सतीश सोनवणे, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, भाजपा गटनेता जगदीश पाटील, शिवसेना गटनेता विलास शिंदे, रिपाइं गटनेत्या दीक्षा लोंढे, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारीव कार्यकर्ते उपस्थित होते.सानप यांनी फेटाळली...आमदार देवयानी फरांदे यांनी गुरुवारी होणारी कपात रद्द करतानाच फक्त जुन्या नाशकात दोनवेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या बैठकीत केली होती. त्यानुसार चर्चा झाली परंतु निर्णय झाला नाही. फरांदे यांनी पत्रकार परिषद हा निर्णयदेखील सांगण्याच प्रयत्न केला, मात्र आमदार बाळासाहेब सानप यांनी तेथेच आयुक्तांनी निर्णय आता घेतला आहे. असे सांगून या विषयाला बगल दिली, परंतु पत्रकार परिषदेतच आमदारांची जुगलबंदी पाहण्यास मिळाली.कपातीमुळे वाचले७५ दशलक्षघनफूट पाणीमहापालिकेने सर्व शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर दर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला. पंधरा दिवसांतच या निर्णयामुळे ७५ दशलक्षघनफूट पाण्याची बचत झाली, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी दिली.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणWaterपाणीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका