शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दुसऱ्याचे वेगळेपण समजून घेतल्यास ताणतणाव कमी : श्रुती पानसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:34 AM

त्येक व्यक्ती ही भिन्न असते. त्याच्या मेंदूतील न्यूट्रॉन्सची जडणघडण पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे अगदी आपला सख्खा कुणी असला तरी तो किंवा ती पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व आहे.

नाशिक : प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असते. त्याच्या मेंदूतील न्यूट्रॉन्सची जडणघडण पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे अगदी आपला सख्खा कुणी असला तरी तो किंवा ती पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व आहे. मग घराबाहेरची व्यक्ती तर पूर्णपणे भिन्न असते, हे एकदा समजून घेतले की माणसाला जीवनातले ताणतणाव कमी करणे शक्य असल्याचे मनोविश्लेषक डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितले.दवप्रभा प्रॉडक्शनच्या वतीने शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत डॉ. श्रुती पानसे यांचे ‘मेंदूचा पासवर्ड’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. पानसे यांनी जन्मापासून ते प्रौढ होण्यापर्यंतची मेंदूतील जडणघडण आणि त्याचे टप्पे उलगडून दाखवले. ज्या मुलाला दुसºया वर्षाच्या आसपास आपली भाषा बोलता येते, ते मूल सामान्य आहे, असे खुशाल समजावे. दोन वर्षांपर्यंत बालकांच्या मेंदूची कार्यक्षमता प्रचंड असल्याने त्याच्या आसपास घडणाºया कोणत्याही बाबी ते मूल चटकन शिकते. साधारणपणे चौथ्या वर्षापासून त्याच्यावर शिक्षणाचा बोजा टाकणे अपेक्षित नसल्याचेही त्यांनी नमूद केले.प्रत्येक व्यक्तीला जसे अनुभव मिळतात, तशी त्याच्या मेंदूची आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. नवनवीन प्रकारचे अनुभव घेतले तर मेंदूतही बदल घडतात. त्यामुळे माणसाने नेहमी आपला कम्फर्ट झोन सोडून दुसरं काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करायला हवे, असे पानसे यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ. पानसे यांनी उपस्थितांच्या समस्यांचे निराकरण केले. प्रा. वृंदा भार्गवे यांनी आभार मानले.चार ते दहा या वयोगटांतील मुलांना भरपूर खेळू देणे, दंगामस्ती करू द्यावे, असेही त्यांनी नमूद केले, तर त्यानंतरच्या वयात मुले बंडखोर बनतात, पण अशा काळात त्यांना जबाबदारीचे काम द्यावे, त्याचे भान द्यावे, असेही पानसे यांनी नमूद केले. सोळाव्या वयाच्या आसपास मुला-मुलींमध्ये प्रचंड मानसिक अस्वस्थता असते. त्या काळात त्यांच्याशी मनमोकळा संवाद कायम राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिक