शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

सरपंचांनी आईच्या मायेने काम करावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:12 PM

भास्करदादा पेरे : सरपंच अवॉर्ड सोहळ्यात सरपंचांना मार्गदर्शन नाशिक : सरपंचांना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त कामाचे अधिकार आहेत; परंतु त्यांना त्यांच्या कामाची व्याप्ती माहीत नाही. अंतर्गत राजकारण आणि हेव्यादाव्यामुळे सरपंच एका चाकोरीत अडकले आहेत. आपल्याला किती अक्कल आहे यापेक्षा आपण किती लोकांना बरोबर घेऊन काम करतो यावर आपली अक्कल ठरत असते. त्यामुळे कोणाचाही भेदभाव आणि कटुता मनात ठेवून काम न करता सरपंचांनी आईच्या मायेने सर्वांना बरोबर घेऊन ग्रामविकास केला पाहिजे, असे प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे सरपंच, राष्टÑपती पुरस्कार विजेते भास्करदादा पेरे यांनी केले.

ठळक मुद्देभास्करदादा पेरे : सरपंच अवॉर्ड सोहळ्यात सरपंचांना मार्गदर्शन सरपंचाला कुणी अज्ञानी म्हणत असले तरी ग्रामपंचायत चालविणे हे प्रशासन चालविण्याइतके सोपे नाही

नाशिक : सरपंचांना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त कामाचे अधिकार आहेत; परंतु त्यांना त्यांच्या कामाची व्याप्ती माहीत नाही. अंतर्गत राजकारण आणि हेव्यादाव्यामुळे सरपंच एका चाकोरीत अडकले आहेत. आपल्याला किती अक्कल आहे यापेक्षा आपण किती लोकांना बरोबर घेऊन काम करतो यावर आपली अक्कल ठरत असते. त्यामुळे कोणाचाही भेदभाव आणि कटुता मनात ठेवून काम न करता सरपंचांनी आईच्या मायेने सर्वांना बरोबर घेऊन ग्रामविकास केला पाहिजे, असे प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे सरपंच, राष्टÑपती पुरस्कार विजेते भास्करदादा पेरे यांनी केले.लोकमतच्या वतीने आयोजित ‘सरपंच अवॉर्ड’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सरपंचांना काही कळत नाही असे समजले जाते; परंतु सरपंचांना जे कळते ते इतर कुणालाही कळत नाही. गावातील कोणतीही गोष्ट करण्यासाठीची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. कोणताही प्रश्न निर्माण झाला तर त्याला दोष न देता त्यातून मार्ग काढून आपण काहीतरी शिकले पाहिजे.गावचा विकास करण्यासाठी प्रत्येकवेळी पैसाच लागतो असे नाही, तर अशी काही कामे आहेत की ज्याला निधीची गरज नसते. झाडे लावणे, पाणी स्वच्छता, सांडपाणी नियोजन, हगणदारीमुक्त मोहीम यासाठी निधी मागण्याची गरज नाही. मानव कल्याणासाठीच्या या योजना सहज राबविता येतात. सरपंचाला कुणी अज्ञानी म्हणत असले तरी ग्रामपंचायत चालविणे हे प्रशासन चालविण्याइतके सोपे नाही, असेही पेरे म्हणाले.सरपंचाला काम करून घेण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल. प्रत्येक काम हे सरपंचाने करायचे नसते. शासनाने तुम्हाला ग्रामसेवक हा सचिव दिला आहे. त्याच्याकडून लिखापडीची सर्व कामे करून घ्या, त्याला कामाला लावा, असा सल्ला त्यांनी दिला.‘असे करू नका; पण कसे करा हे कुणी सांगत नाही...’भास्करदादा पेरे यांनी आपल्या खुमासदार शेैलीतील ग्रामीण ढंगाच्या भाषणाने अवघे सभागृह खिळवून ठेवले. त्यांनी प्रशासकीय कामातील औपचारिकतेवर नेमके भाष्य केले. रस्त्यावर अनेक ठिकाणी येथे पार्किंग करू नका, येथे थुंकू नका असे फलक लिहिलेले असतात. येथे नको तर मग कुठे, असा मार्ग मात्र दाखविला जात नाही. प्रशासन राबविणारी यंत्रणा नेमके हेच विसरते आणि त्यातून साध्य मात्र काहीच होत नाही. काय करू नका यापेक्षा काय करावे असे काम प्रशासनाकडून अपेक्षित आहे. या बाबीचा खूप विचार केला. नंतर यातून मला कल्पना सुचली आणि मी गावात ठिकठिकाणी ४० बेसिन बसविले, बेसिनला चोवीस तास पाणी दिले आणि तेथे लिहिले- ‘येथे थुंका’.माझे पाटोदा गाव संपूर्णपणे हगणदारीमुक्त केले आहे. आमच्या गावातील दोन महिलांना मी बोलताना ऐकले. त्या एकमेकींना विचारत होत्या, तू गावाला गेली होती का? दुसरी म्हणे, नाही. दुसरीने पहिलीला विचारले, तू गेली होती का? तीही नाही म्हणाली. दोघीही गावाला गेलेल्या नाहीत तरीही यांना असे का वाटले की ती गावाला गेली असावी. हे बोलणे मी ऐकल्यानंतर विचार केला असे का झाले. त्यातून मला आणखी एक मार्ग सापडला. गाव हगणदारीमुक्त झाल्याने रोज सकाळी भेटणाºया या महिला एकमेकींना भेटेनासे झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यातील संवाद कमी झाला. मग आम्ही गावाच्या चारही बाजूला धोबीघाट तयार केले, तेथे धुणे धुण्यासाठीची व्यवस्था केली. त्यामुळे महिलांना एकमेकींना भेटण्यासाठीची जागा झाली.