शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या  सलगीने मनसेमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:51 IST

मराठी माणसाच्या हितासाठीचा मुद्दा हाती घेत उत्तर भारतीयांशी दोन हात करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता परप्रांतियांच्या व्यासपीठावर जाण्यासाठी केलेली तयारी नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांना अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे.

नाशिक : मराठी माणसाच्या हितासाठीचा मुद्दा हाती घेत उत्तर भारतीयांशी दोन हात करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता परप्रांतियांच्या व्यासपीठावर जाण्यासाठी केलेली तयारी नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांना अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे.  नाशिकमध्ये याच विषयावर सर्वाधिक आंदोलने पेटवणाऱ्या कार्यकर्त्यांनी खासगीत याबाबत नाराजी व्यक्त करताना राज ठाकरे हे कार्यक्रमास जातील, असे वाटत नसल्याचा आशावादही व्यक्त केला आहे.  राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांना नाशिकमध्ये मोठी साथ मिळाली होती. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलने केली. नाशिक शहरातील सातपूर येथील एका सांस्कृतिक कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उधळून लावले तर शहरातील दगडफेकीत एका मराठी माणसाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल असून, ते सध्या कोर्टाच्या वाºया करीत आहेत. असे असतानाच राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मुंबईतील कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याने नाशिकमधील लढवय्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.  मराठी माणसाची साथ शिवसेनेने सोडली मात्र मनसेने हा मुद्दा हाती घेतल्यानंतर नाशिककरांचा प्रतिसाद वाढला आणि पक्षाचे तीन आमदार आणि चाळीस नगरसेवक निवडून आले होते. परंतु हा मूळ मुद्दा निघून गेला तर काय उपयोग असा प्रश्न कार्यकर्त्यांनी खासगीत केला आहे.मराठी मुद्दा नव्हे अस्मितामनसेचा मराठीचा मुद्दा नसून अस्मिता आहे. त्यापोटीच मनसेने उत्तर भारतीयांपाठोपाठ गुजराथी वर्गाला दुखावले आहे. आता मराठी माणसांच्या भावना दुखावल्या तर पाठबळ कोणाचे मिळणार, असा प्रश्न एका कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे.राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेचे स्वागत करतो, कालांतराने अनेक पक्षांच्या आणि नेत्यांच्या भूमिका बदलतात. तसा बदल राज ठाकरे यांच्यात दिसतो आहे. महाराष्टचे नवनिर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याने यापूर्वी त्यांना उत्तर भारतीयांच्या रोषापोटी जे करता आले नव्हते ते करता येईल. पक्ष विस्तार करून जय उत्तर भारतीय तसेच पुढे जय गुजरातही म्हणता येईल.  - वसंत गिते, माजी आमदार, मनसे (सध्या प्रदेश उपाध्यक्ष भाजपा)

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे