शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या  सलगीने मनसेमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:51 IST

मराठी माणसाच्या हितासाठीचा मुद्दा हाती घेत उत्तर भारतीयांशी दोन हात करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता परप्रांतियांच्या व्यासपीठावर जाण्यासाठी केलेली तयारी नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांना अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे.

नाशिक : मराठी माणसाच्या हितासाठीचा मुद्दा हाती घेत उत्तर भारतीयांशी दोन हात करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता परप्रांतियांच्या व्यासपीठावर जाण्यासाठी केलेली तयारी नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांना अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे.  नाशिकमध्ये याच विषयावर सर्वाधिक आंदोलने पेटवणाऱ्या कार्यकर्त्यांनी खासगीत याबाबत नाराजी व्यक्त करताना राज ठाकरे हे कार्यक्रमास जातील, असे वाटत नसल्याचा आशावादही व्यक्त केला आहे.  राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांना नाशिकमध्ये मोठी साथ मिळाली होती. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलने केली. नाशिक शहरातील सातपूर येथील एका सांस्कृतिक कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उधळून लावले तर शहरातील दगडफेकीत एका मराठी माणसाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल असून, ते सध्या कोर्टाच्या वाºया करीत आहेत. असे असतानाच राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मुंबईतील कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याने नाशिकमधील लढवय्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.  मराठी माणसाची साथ शिवसेनेने सोडली मात्र मनसेने हा मुद्दा हाती घेतल्यानंतर नाशिककरांचा प्रतिसाद वाढला आणि पक्षाचे तीन आमदार आणि चाळीस नगरसेवक निवडून आले होते. परंतु हा मूळ मुद्दा निघून गेला तर काय उपयोग असा प्रश्न कार्यकर्त्यांनी खासगीत केला आहे.मराठी मुद्दा नव्हे अस्मितामनसेचा मराठीचा मुद्दा नसून अस्मिता आहे. त्यापोटीच मनसेने उत्तर भारतीयांपाठोपाठ गुजराथी वर्गाला दुखावले आहे. आता मराठी माणसांच्या भावना दुखावल्या तर पाठबळ कोणाचे मिळणार, असा प्रश्न एका कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे.राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेचे स्वागत करतो, कालांतराने अनेक पक्षांच्या आणि नेत्यांच्या भूमिका बदलतात. तसा बदल राज ठाकरे यांच्यात दिसतो आहे. महाराष्टचे नवनिर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याने यापूर्वी त्यांना उत्तर भारतीयांच्या रोषापोटी जे करता आले नव्हते ते करता येईल. पक्ष विस्तार करून जय उत्तर भारतीय तसेच पुढे जय गुजरातही म्हणता येईल.  - वसंत गिते, माजी आमदार, मनसे (सध्या प्रदेश उपाध्यक्ष भाजपा)

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे