शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
6
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
7
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
8
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
9
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
10
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
11
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
12
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
13
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
14
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
15
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
16
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
17
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
18
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
19
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
20
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...

राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या  सलगीने मनसेमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:51 IST

मराठी माणसाच्या हितासाठीचा मुद्दा हाती घेत उत्तर भारतीयांशी दोन हात करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता परप्रांतियांच्या व्यासपीठावर जाण्यासाठी केलेली तयारी नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांना अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे.

नाशिक : मराठी माणसाच्या हितासाठीचा मुद्दा हाती घेत उत्तर भारतीयांशी दोन हात करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता परप्रांतियांच्या व्यासपीठावर जाण्यासाठी केलेली तयारी नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांना अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे.  नाशिकमध्ये याच विषयावर सर्वाधिक आंदोलने पेटवणाऱ्या कार्यकर्त्यांनी खासगीत याबाबत नाराजी व्यक्त करताना राज ठाकरे हे कार्यक्रमास जातील, असे वाटत नसल्याचा आशावादही व्यक्त केला आहे.  राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांना नाशिकमध्ये मोठी साथ मिळाली होती. त्यानंतर त्यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलने केली. नाशिक शहरातील सातपूर येथील एका सांस्कृतिक कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी उधळून लावले तर शहरातील दगडफेकीत एका मराठी माणसाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल असून, ते सध्या कोर्टाच्या वाºया करीत आहेत. असे असतानाच राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मुंबईतील कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याने नाशिकमधील लढवय्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.  मराठी माणसाची साथ शिवसेनेने सोडली मात्र मनसेने हा मुद्दा हाती घेतल्यानंतर नाशिककरांचा प्रतिसाद वाढला आणि पक्षाचे तीन आमदार आणि चाळीस नगरसेवक निवडून आले होते. परंतु हा मूळ मुद्दा निघून गेला तर काय उपयोग असा प्रश्न कार्यकर्त्यांनी खासगीत केला आहे.मराठी मुद्दा नव्हे अस्मितामनसेचा मराठीचा मुद्दा नसून अस्मिता आहे. त्यापोटीच मनसेने उत्तर भारतीयांपाठोपाठ गुजराथी वर्गाला दुखावले आहे. आता मराठी माणसांच्या भावना दुखावल्या तर पाठबळ कोणाचे मिळणार, असा प्रश्न एका कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे.राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेचे स्वागत करतो, कालांतराने अनेक पक्षांच्या आणि नेत्यांच्या भूमिका बदलतात. तसा बदल राज ठाकरे यांच्यात दिसतो आहे. महाराष्टचे नवनिर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याने यापूर्वी त्यांना उत्तर भारतीयांच्या रोषापोटी जे करता आले नव्हते ते करता येईल. पक्ष विस्तार करून जय उत्तर भारतीय तसेच पुढे जय गुजरातही म्हणता येईल.  - वसंत गिते, माजी आमदार, मनसे (सध्या प्रदेश उपाध्यक्ष भाजपा)

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे