शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

एस.टी.कडून पुन्हा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:32 IST

नाशिक : शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेला शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र पालिकेने प्रत्यक्षात पाऊल उचललेले नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने आता पुन्हा पालिकेला अल्टिमेटम दिला असून, येत्या महिनाभरात शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. महामंडळाच्या ...

नाशिक : शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेला शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र पालिकेने प्रत्यक्षात पाऊल उचललेले नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने आता पुन्हा पालिकेला अल्टिमेटम दिला असून, येत्या महिनाभरात शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. महामंडळाच्या या पत्रावरून नवीन वर्षापासून एस.टी. महामंडळ शहर बससेवा थांबविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  शहर बससेवा चालविणे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेची जबाबदारी असल्याने पालिकेने प्रवासी वाहतूक सेवा ताब्यात घ्यावी, यासाठी एस.टी. महामंडळाने वारंवार पत्रव्यवहार केला आहे. महामंडळाने अनेकदा निर्वाणीची भाषा वापरून कोणत्याही क्षणी शहर बससेवा बंद करण्याचीदेखील भूमिका घेतली होती. शहरातील जवळपास १३० बसफेºया बंददेखील करण्यात आलेल्या आहेत. मात्र अजूनही पालिकेकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. शहरानजीकच्या ग्रामीण भागातील बसेस बंद केल्यानंतर स्थानिक गावकरी आणि विद्यार्थ्यांनी बससेवा बंद करू नये, यासाठी महामंडळाला साकडे घातल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता महामंडळाने तूर्तास सर्व बसेस बंद न करण्याची भूमिका घेत लांबपल्ल्याच्या गाड्यांना महामार्गावरील गावांचे थांबे देण्यात येऊन  तात्पुरता पर्याय काढण्यात आला आहे. सुरुवातीच्या विरोधानंतर महापालिकेने आता काही प्रमाणात अनुकूलता दर्शविली असून, यासंदर्भात एक समिती गठित करून खासगी संस्थांच्या माध्यमातून बससेवा चालविण्याच्या पर्यायाबाबत विचार केला जाईल, असे जाहीर केलेले आहे.  मात्र पालिकेची एकूणच मानसिकता आणि होणारा विलंब लक्षात घेता महामंडळाने पालिकेला त्वरित निर्णय घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. महामंडळाला आता बस चालविणे शक्य नसल्याने आणि राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांची बससेवा सुरू केल्यामुळे नाशिक महापालिकेने देखील दोन महिन्यांत याबाबत निर्णय घ्यावा, असे पालिकेला कळविले आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत शहरातील प्रवासी कोणत्या सार्वजनिक वाहनाने प्रवास करतील, याचा फैसला होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलासा शहरापासून जवळच म्हणजे महापालिका हद्दीच्या सीमारेषांवरील गावांमधील बससेवा महामंडळाने बंद केली होती. सुमारे दीडशेपेक्षा जादा बसेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाºया नागरिकांचे आणि विशेषत: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने महामंहळाकडे तक्रारी वाढल्या होत्या. लोकप्रतिनिधींनीदेखील तूर्तास बसेस बंद न करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने मुंगसरा, सिद्धपिंप्री, मखमलाबाद, सायखेडा, शिवडा, लाखलगाव, भगूर, गिरणारे येथील बंद केलेल्या बसेसच्या फेºया पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक