शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

एस.टी.कडून पुन्हा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:32 IST

नाशिक : शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेला शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र पालिकेने प्रत्यक्षात पाऊल उचललेले नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने आता पुन्हा पालिकेला अल्टिमेटम दिला असून, येत्या महिनाभरात शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. महामंडळाच्या ...

नाशिक : शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेला शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र पालिकेने प्रत्यक्षात पाऊल उचललेले नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने आता पुन्हा पालिकेला अल्टिमेटम दिला असून, येत्या महिनाभरात शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. महामंडळाच्या या पत्रावरून नवीन वर्षापासून एस.टी. महामंडळ शहर बससेवा थांबविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  शहर बससेवा चालविणे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेची जबाबदारी असल्याने पालिकेने प्रवासी वाहतूक सेवा ताब्यात घ्यावी, यासाठी एस.टी. महामंडळाने वारंवार पत्रव्यवहार केला आहे. महामंडळाने अनेकदा निर्वाणीची भाषा वापरून कोणत्याही क्षणी शहर बससेवा बंद करण्याचीदेखील भूमिका घेतली होती. शहरातील जवळपास १३० बसफेºया बंददेखील करण्यात आलेल्या आहेत. मात्र अजूनही पालिकेकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. शहरानजीकच्या ग्रामीण भागातील बसेस बंद केल्यानंतर स्थानिक गावकरी आणि विद्यार्थ्यांनी बससेवा बंद करू नये, यासाठी महामंडळाला साकडे घातल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता महामंडळाने तूर्तास सर्व बसेस बंद न करण्याची भूमिका घेत लांबपल्ल्याच्या गाड्यांना महामार्गावरील गावांचे थांबे देण्यात येऊन  तात्पुरता पर्याय काढण्यात आला आहे. सुरुवातीच्या विरोधानंतर महापालिकेने आता काही प्रमाणात अनुकूलता दर्शविली असून, यासंदर्भात एक समिती गठित करून खासगी संस्थांच्या माध्यमातून बससेवा चालविण्याच्या पर्यायाबाबत विचार केला जाईल, असे जाहीर केलेले आहे.  मात्र पालिकेची एकूणच मानसिकता आणि होणारा विलंब लक्षात घेता महामंडळाने पालिकेला त्वरित निर्णय घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. महामंडळाला आता बस चालविणे शक्य नसल्याने आणि राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांची बससेवा सुरू केल्यामुळे नाशिक महापालिकेने देखील दोन महिन्यांत याबाबत निर्णय घ्यावा, असे पालिकेला कळविले आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत शहरातील प्रवासी कोणत्या सार्वजनिक वाहनाने प्रवास करतील, याचा फैसला होणार आहे. विद्यार्थ्यांना दिलासा शहरापासून जवळच म्हणजे महापालिका हद्दीच्या सीमारेषांवरील गावांमधील बससेवा महामंडळाने बंद केली होती. सुमारे दीडशेपेक्षा जादा बसेस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाºया नागरिकांचे आणि विशेषत: विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागल्याने महामंहळाकडे तक्रारी वाढल्या होत्या. लोकप्रतिनिधींनीदेखील तूर्तास बसेस बंद न करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महामंडळाने मुंगसरा, सिद्धपिंप्री, मखमलाबाद, सायखेडा, शिवडा, लाखलगाव, भगूर, गिरणारे येथील बंद केलेल्या बसेसच्या फेºया पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक