शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याने सेनेच्या इच्छूकांना बूस्ट

By श्याम बागुल | Published: September 28, 2019 7:07 PM

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाही युती घोषणा व जागा वाटप जाहीर होत नसल्याने शिवसेनेच्या इच्छूकांची अगोदरच घालमेल सुरू झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक तयारीला लागलेले आहेत

ठळक मुद्देयुती न होण्याचे संकेत : मतदार संघात लागले कामाला इच्छूकांचा मेळावा घेवून ‘शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’ असे जाहीर केले

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या इच्छूकांचे युतीची घोषणा व जागांच्या वाटपाकडे लक्ष लागून असताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व इच्छूकांचा मेळावा घेवून ‘शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’ असे जाहीर केल्याने निवडणुकीसाठी भाजपाबरोबर युती होणार नाही असा समज इच्छूकांमध्ये निर्माण झाला असून, मेळाव्यासाठी मुंबईला गेलेले इच्छूक नाशकात परतल्यानंतर जोमाने प्रचाराला लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक असतानाही युती घोषणा व जागा वाटप जाहीर होत नसल्याने शिवसेनेच्या इच्छूकांची अगोदरच घालमेल सुरू झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील इच्छूक गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक तयारीला लागलेले आहेत. मेळावे, बैठका घेण्याबरोबरच भेटवस्तूंचे वाटप, सामाजिक,सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजनावर लाखोंचा खर्च करीत आहेत. पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याची वाट पहात असून, पक्षानेही सर्व इच्छूकांना कामाला लागण्याचे संदेश यापुर्वीच दिले आहेत. असे असले तरी, भाजपा बरोबर युतीची बोलणीही सुरू आहे. त्यामुळे नेमके काय होणार असा प्रश्न इच्छूकांना पडला आहे. युती झाली तर मतदार संघ सुटणार काय आणि सुटला तरी, उमेदवारी मिळणार काय अशा तिहेरी प्रश्नाभोवती ते गुरफटलेले असताना शनिवारी मुंबईत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व इच्छूक उमेदवारांना पाचारण करून मेळावा घेतला व त्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा केली. एकीकडे भाजपाबरोबर युतीची बोलणी सुरू असल्याचे सांगणाऱ्या ठाकरे यांनी सेना सर्व जागा लढविण्याच्या तयारीत असल्याचे चित्र उभे केल्यामुळे इच्छूकांना बुस्ट मिळाला आहे. त्यांच्या मते युती होण्याची शक्यता मावळल्यानेच ठाकरे यांनी पदाधिकारी व इच्छूकांना स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी तयार राहण्याचा संदेश देण्यासाठी मेळावा घेतला आहे. युती होणारच आहे तर ठाकरे यांनी मेळावा न घेता मुंबईतूनच त्याची घोेषणा केली असती किंवा मेळाव्यातच तसे जाहीर करून ज्या इच्छूकांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना बंडखोरी वा प्रतारणा न करण्याचे आवाहन केले असते. मात्र ठाकरे यांनी यापैकी काहीच केले नाही. त्यामुळे युतीबाबत अजुनही अनिश्चितता असल्याचा संदेश ठाकरे यांनी मेळाव्याद्वारे दिला असून, त्यामुळे इच्छूकांना बुस्ट मिळाले आहे. मेळावा आटोपल्यानंतर नाशकात परतलेल्या इच्छूकांनी तेच संकेत समजून जोरदार कामाला लागले आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक