आई रागावल्याने पंचवटीतील दोघी मुलींनी सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:20 IST2021-09-08T04:20:39+5:302021-09-08T04:20:39+5:30
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनाथनगरमधील दोन कुटुंबांच्या १४ व १५ वर्षीय मुलींनी आई रागावल्याच्या कारणामुळे घर सोडले होते. त्यांच्या ...

आई रागावल्याने पंचवटीतील दोघी मुलींनी सोडले घर
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनाथनगरमधील दोन कुटुंबांच्या १४ व १५ वर्षीय मुलींनी आई रागावल्याच्या कारणामुळे घर सोडले होते. त्यांच्या कुटुंबीयांकडून सर्वत्र शोध घेतला गेला; मात्र त्या कोठेही सापडल्या नाहीत. यामुळे अखेर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांनी गुन्हे शोध पथकाची बैठक घेत या दोन्ही अल्पवयीन मुलींना लवकरात लवकर कुठल्याही परिस्थितीत शाेधून काढण्याचा ‘टास्क’ सोपविला. सहायक निरीक्षक सत्यवान पवार, उपनिरीक्षक दीपक पटारे, राकेश शिंदे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे रामनाथ पाटील यांच्या मदतीने गुन्हे शोध पथकाने अखेर त्या दोन्ही अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश मिळविले. या दोन्ही मुलींना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.